शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सोनाळीला पाणी पुरवठा करणारी विहीर झाली गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:21 IST

बोरवडे : सोनाळी (ता. कागल) गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहीर आणि टाकीमध्ये साचलेल्या गाळामुळे गावाला दूषित पाण्याचा ...

बोरवडे : सोनाळी (ता. कागल) गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहीर आणि टाकीमध्ये साचलेल्या गाळामुळे गावाला दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. याची दखल घेत गावातील सहजसेवा फौंडेशनच्या सदस्यांनी श्रमदान करून ही विहीर गाळमुक्त केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावाला आता पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

डोंगरकपारीत वसलेल्या सोनाळी गावाला नदीऐवजी सार्वजनिक विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. विहिरीतील पाणी पंपाद्वारे उपसा करुन टाकीत सोडले जाते आणि तेथून ते नळाद्वारे ग्रामस्थांना दिले जाते. परंतु मागील काही दिवसांपासून नळाला दूषित पाणी येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करीत ग्रामसभेत हा मुद्दा अनेक वेळा उचलून धरला होता.

ग्रामपंचायतीकडून याबाबतीत होणारे दुर्लक्ष विचारात घेऊन सहजसेवा फौंडेशनच्या सदस्यांनी या विहीर आणि टाकीतील गाळ श्रमदानाने काढण्याचे ठरवले. फौंडेशनच्या सदस्यांनी स्वतः विहिरीत उतरत जेसीबी मशीनच्या साहाय्याने विहिरीतील गाळ काढला. श्रमदानातून विहीर गाळमुक्त झाल्याने गावाला आता पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.

यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी बचाटे, विनायक म्हातुगडे, उत्तम पोकलेकर, अनिल सुतार, जी.आर. लोंढे, मधुकर भोसले, प्रवीण खोळांबे, धनाजी पोवार, कुंडलिक धनवडे, सुनील खोळांबे, आदेश पाटील,रणजित वैद्य, भिकाजी बचाटे, ज्ञानदेव लोंढे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले. त्यांना सरपंच तानाजी कांबळे, उपसरपंच सुवर्णा भोसले, ग्रामसेवक सुनील गुजर यांच्यासह सर्व ग्रा.पं. सदस्य व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

फोटो ओळी :

सोनाळी (ता. कागल) येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीतील गाळ जेसीबी मशीनच्या साहाय्याने काढताना सहजसेवा फौंडेशननचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य.