शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

तृतीयपंथीयांसाठी हवे कल्याणकारी मंडळ

By admin | Updated: August 19, 2016 00:35 IST

योजनांपासून वंचित : संख्या निश्चितीसाठी सर्वेक्षणाची गरज

इंदुमती गणेश -- कोल्हापूर ‘तृतीयपंथी’ म्हटले की ‘साडी नेसलेला पुरुष’ म्हणून हेटाळणी होती. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मंडळामुळे तृतीयपंथीयांचे मानवी हक्क अबाधित राहून त्यांना सर्वसामान्य जीवन जगता येऊ शकेल असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या साधना झाडबुके यांनी तशी लेखी मागणी मुख्यमंत्र्यांकडेही केली आहे. समाजात स्त्री-पुरुषांना मान आहे मात्र तृतीयपंथीयांना बीभत्स नजरांचा सामना करावा लागतो. ‘आई खाऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही,’ अशी त्यांची अवस्था आहे. दैनंदिन आयुष्य जगताना विचित्र नजरा त्यांना झेलाव्या लागतात. पुरुषांकडून त्रास सहन करावा लागतो, जाता-येता अश्लील भाषेतील टोमणे ऐकावे लागतात. स्त्री म्हणून काम करू शकत नाही पुरुष म्हणून नोकरी, व्यवसाय करू शकत नाही. काही धडपड केलीच तर समाज सन्मानाने जगू देत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे. शासनाच्या प्रत्येक अर्जात, नियमावलीत स्त्री आणि पुरुष असे दोन पर्याय, तृतीयपंथीयांच्या नावाला स्थानच नाही. या सगळ््यामुळे व्यक्ती म्हणून सर्वसामान्य जीवन जगण्याचा त्यांचा अधिकारच नष्ट करण्यात आला. या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याने जुलैमध्ये स्त्री-पुरुष आणि तृतीयपंथी असे तीन कॉलम करण्यात आले व तृतीयपंथीयांना इतर मागासवर्गीयाप्रमाणे सर्व योजनांचा लाभ द्यावा, असे नमूद करण्यात आले. विशेष सहाय्य विभागातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ अनुदान योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये तृतीयपंथीयांनाही सहभागी करावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, तृतीयपंथी नक्की कोणाला म्हणायचे हे संबंधित खाते ठरवू शकत नाही. त्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी लागणार आहे. याद्वारे तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून तसे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावेत. या आधारावर त्यांना दत्तक, विवाह, पालकत्व, शैक्षणिक, नोकरी, यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.तृतीयपंथीयांना समाजाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना शैक्षणिकसह आर्थिक, सामाजिक स्तरावर समान न्याय दिला पाहिजे. त्यासाठी शासन पातळीवर कल्याणकारी मंडळाची स्थापना होणे गरजेचे आहे. कोल्हापुरात ही सुरुवात झाली तर राज्यासमोर नवा आदर्श निर्माण होईल- प्रा. साधना झाडबुके, सामाजिक कार्यकर्त्या