शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

टोलमुक्तीबद्दल पालकमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत

By admin | Updated: December 27, 2015 01:29 IST

भाजपकडून आनंदोत्सव : इच्छाशक्ती अन् मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे टोलमुक्ती

कोल्हापूर : कोल्हापूरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनलेल्या ‘टोल’चा प्रश्न निकालात काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे शनिवारी कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून जल्लोष केला. इच्छाशक्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ही टोलमुक्ती शक्य झाली, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले. टोलमुक्तीचा निर्णय घेतल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर त्यांचे छत्रपती शिवाजी चौकात महानगर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत करून भव्य सत्कार केला. त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो....’, ‘पालकमंत्री तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...’, ‘केली रे केली भाजपने टोलमुक्ती केली...’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नागरिकांना साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कॉँग्रेस आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असताना प्रशासकीय स्तरावर टोलमुक्तीचा निर्णय घेणे अत्यंत जोखमीचे होते; पण इच्छाशक्ती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ही टोलमुक्ती शक्य झाली. यासाठी भाजपचे सरकार व मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. यापुढेही कोल्हापुरात विकासाचे पर्व अशाच पद्धतीने पुढे चालत राहील. महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, भाजप तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. रामभाऊ चव्हाण, अशोक देसाई, संतोष भिवटे, राहुल चिकोडे, विजय जाधव, मारुती भागोजी, राजाराम शिपुगडे, मामा कोळवणकर, दिलीप मैत्राणी, सुभाष रामुगडे, संदीप देसाई, सुरेश जरग, गणेश देसाई, अ‍ॅड. संपतराव पवार, अमोल पालोजी, मधुमती पावणगडकर, भारती जोशी, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रभा टिपुगडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)