शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत कमी करण्याचा आदेश द्यावा. तसेच सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत कमी करण्याचा आदेश द्यावा. तसेच सध्या ७० किलोंपेक्षा अधिक गाठीचे वजन असून, ते कमी करावे, अशा मागणीचे निवेदन टेम्पोचालक-मालक कल्याणकारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.

निवेदनात, शहरामध्ये तयार होत असलेल्या पक्क्या व कच्च्या कापडाच्या गाठी उचलणारे टेम्पोधारक व माथाडी हमालधारक आहेत. शासनाच्या नियमानुसार एका व्यक्तीने ५० किलो वजन उचलण्याचा अध्यादेश आहे. मात्र, तरीही ट्रान्स्पोर्टधारक हे व्यापारी वर्ग टेम्पोधारक व माथाडी हमाल यांचा कोणताही विचार न करता ७० ते ७५ किलोंपर्यंतच्या गाठी उचलण्यास भाग पाडतात. तसेच ट्रान्स्पोर्टधारकास बळजबरीने किंवा जादा पैसे देण्याच्या नावाखाली ८० ते ११० पुढे किलोंपर्यंतच्या गाठी शिवून पाठवितात. तरी कापडाच्या गाठीचे वजन कमी करून आम्हास सहकार्य करावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात मिश्रीलाल जाजू, सचिन जाधव, इसाक आवळे, साताप्पा आदमापुरे, प्रभू काकणकी, अब्राहम भोसले, आदींचा समावेश होता.

फोटो ओळी

२३०९२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजीत कापडाच्या गाठीचे वजन ५० किलोंपर्यंत करावे, अशा मागणीचे निवेदन टेम्पोचालक-मालक कल्याणकारी असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.