शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

जिल्ह्यातील सर्वच १०२५ ग्रामपंचायतींचे बुधवारी आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात आता निवडणूक झालेल्या ४३३ व ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक होणाऱ्यासह १०२५ ग्रामपंचायतींच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्ह्यात आता निवडणूक झालेल्या ४३३ व ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक होणाऱ्यासह १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची बुधवारी (दि. २७) सोडत काढली जाणार आहे. आता झालेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीनंतर आरक्षण काढले माग उर्वरित ग्रामपंचायतींसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात असून यावरून न्यायालयीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे एकत्रित सरपंच आरक्षण काढले जाते. त्यानंतर मुदत संपेल त्याप्रमाणे निवडणुकांची प्रक्रिया राबवली जाते. जिल्ह्यात तीन टप्प्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतात. त्यात २०२० व २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या टप्प्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. प्रभागरचना, प्रभाग आरक्षण काढल्यानंतर सरपंच आरक्षण काढले जाणार होते. मात्र निवडणुकीच्या अगोदर सरपंच आरक्षण काढले तर ज्या प्रभागात आरक्षण संबंधित उमेदवार आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात इर्षा निर्माण होऊन संघर्ष उफाळून येतो. निवडणूक निकोप पार पडावी, यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होत आहे. संबंधित ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी आदी यंत्रणेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मात्र या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणास वेगळा न्याय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यावरून राज्यात वाद तयार होऊ शकतो, शासनाच्या या प्रक्रियेला न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकते.