शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्वच १०२५ ग्रामपंचायतींचे बुधवारी आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात आता निवडणूक झालेल्या ४३३ व ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक होणाऱ्यासह १०२५ ग्रामपंचायतींच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्ह्यात आता निवडणूक झालेल्या ४३३ व ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक होणाऱ्यासह १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची बुधवारी (दि. २७) सोडत काढली जाणार आहे. आता झालेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीनंतर आरक्षण काढले माग उर्वरित ग्रामपंचायतींसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात असून यावरून न्यायालयीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे एकत्रित सरपंच आरक्षण काढले जाते. त्यानंतर मुदत संपेल त्याप्रमाणे निवडणुकांची प्रक्रिया राबवली जाते. जिल्ह्यात तीन टप्प्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतात. त्यात २०२० व २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या टप्प्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. प्रभागरचना, प्रभाग आरक्षण काढल्यानंतर सरपंच आरक्षण काढले जाणार होते. मात्र निवडणुकीच्या अगोदर सरपंच आरक्षण काढले तर ज्या प्रभागात आरक्षण संबंधित उमेदवार आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात इर्षा निर्माण होऊन संघर्ष उफाळून येतो. निवडणूक निकोप पार पडावी, यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होत आहे. संबंधित ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी आदी यंत्रणेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मात्र या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणास वेगळा न्याय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यावरून राज्यात वाद तयार होऊ शकतो, शासनाच्या या प्रक्रियेला न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकते.