शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

जिल्ह्यातील सर्वच १०२५ ग्रामपंचायतींचे बुधवारी आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात आता निवडणूक झालेल्या ४३३ व ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक होणाऱ्यासह १०२५ ग्रामपंचायतींच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्ह्यात आता निवडणूक झालेल्या ४३३ व ऑक्टोबर २०२२ मध्ये निवडणूक होणाऱ्यासह १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाची बुधवारी (दि. २७) सोडत काढली जाणार आहे. आता झालेल्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीनंतर आरक्षण काढले माग उर्वरित ग्रामपंचायतींसाठी वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात असून यावरून न्यायालयीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे एकत्रित सरपंच आरक्षण काढले जाते. त्यानंतर मुदत संपेल त्याप्रमाणे निवडणुकांची प्रक्रिया राबवली जाते. जिल्ह्यात तीन टप्प्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतात. त्यात २०२० व २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या टप्प्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. प्रभागरचना, प्रभाग आरक्षण काढल्यानंतर सरपंच आरक्षण काढले जाणार होते. मात्र निवडणुकीच्या अगोदर सरपंच आरक्षण काढले तर ज्या प्रभागात आरक्षण संबंधित उमेदवार आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात इर्षा निर्माण होऊन संघर्ष उफाळून येतो. निवडणूक निकोप पार पडावी, यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होत आहे. संबंधित ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी आदी यंत्रणेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मात्र या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणास वेगळा न्याय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यावरून राज्यात वाद तयार होऊ शकतो, शासनाच्या या प्रक्रियेला न्यायालयातही आव्हान दिले जाऊ शकते.