शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावध होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

कोल्हापूर : हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपल्याला ...

कोल्हापूर : हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मानवाने हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावधगिरीची पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे (आयआयएससी) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी मंगळवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलिटी स्टडीजतर्फे ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ या विषयावरील व्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्यातील पहिले पुष्प ‘तापमानवाढ व जलस्रोतांवर होणारा परिणाम’ या विषयावर डॉ. कुलकर्णी यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. ढगफुटी, हिमस्खलन, भूस्खलन, फ्लॅश फ्लड अशी अनेक आव्हाने तेथील लोकसमुदायासमोर आहेत. हिमनदी तलावांची निर्मिती व त्याचा बेड रॉकवर पडलेला दबाव यामुळे फ्लॅश फ्लडचा धोका अधिक वाढतो. हा धोका टाळणे शक्य आहे, पण त्यासाठी मॉडेलिंग टेक्निक वापरून फ्लो पाथ, व्हेलोसिटी, धोक्याची तीव्रता, हिमनदी तलावांचे स्थान व भविष्यातील त्याचा विस्तार या गोष्टींकडे नवीन अभ्यासकांनी लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. हवामान बदलांच्या दुष्परिणामांना अटकाव करण्यासाठी संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन आणि उपाययोजना करण्याची गरज असल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले. डॉ. सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले.

लडाखमध्ये बर्फाच्या स्तूपव्दारे पाणी संवर्धन

‘पोटॅन्शियल ग्लॅशियर रिट्रीट : स्पिती व्हॅली’ या अभ्यासानुसार, सिंधु खोऱ्यातील स्पिती व्हॅली भागात भविष्यात २०५०पर्यंत जवळपास ६० टक्के, तर २०७०पर्यंत ६६ टक्के बर्फ वितळण्याची शक्यता व्यक्त केली. इतर ऋतूंमधील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी लडाखमध्ये बर्फाचे स्तूप निर्माण करून ७.५ कोटी लीटर पाण्याचे संवर्धन केले आहे. इतर भागांमध्ये हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी अधिक वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.