शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला प्राधिकरण नको ४२ गावांची भूमिका : पालकमंत्र्यांनी बैठक घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:46 IST

कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ नको म्हणून संघर्ष केला. त्यात यशही आले; पण शासनाने हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाचे भूत आमच्या मानगुटीवर आणून ठेवले.

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ नको म्हणून संघर्ष केला. त्यात यशही आले; पण शासनाने हद्दवाढीऐवजी प्राधिकरणाचे भूत आमच्या मानगुटीवर आणून ठेवले. या प्राधिकरणाला आमचा विरोध असून, आम्हाला प्राधिकरण नकोच, अशी कडक भूमिका ४२ गावांचे सरपंच, सदस्यांसह लोकप्रतिनिधींनी शनिवारी घेतली.

कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्णातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाची आठ दिवसांत एकत्रित बैठक घ्यावी, असा सर्वांनुमते ठराव यावेळी करण्यात आला. पूर्वी हद्दवाढीमध्ये १८ गावांचा समावेश होता; पण आणखी २४ गावांचा समावेश करून शासनाने प्राधिकरण आणून आमची दिशाभूल केली असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथे प्राधिकरणविरोधी कृती समितीची आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांच्या उपस्थितीत दुपारी बैठक झाली. यावेळी कृती समितीचे नाथाजीराव पोवार यांनी, प्राधिकरणाबाबतची माहिती दिली.

यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले, टोल व हद्दवाढप्रश्नी आपण लढा दिला. त्यात आपणाला यश आले. शासनाने हद्दवाढ रद्द करून प्राधिकरण आणले. प्राधिकरण म्हणजे काय, हे आम्हाला समजलेले नाही. या प्राधिकरणामुळे जर शेतकरी व ग्रामपंचायती धोक्यात येणार असतील, तर त्याला आमचा विरोध राहणार आहे. उलट, १४ व्या वित्त आयोगामधून केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी ग्रामपंचायतींना आला आहे. शेती हा आमचा आत्मा आहे. प्राधिकरणाला आम्ही एक इंचही जागा देणार नाही. यातून शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा प्रकार आहे.

त्यामुळे राजकीय गट-तट, कोण मोठा, कोण छोटा हे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित यावे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४२ गावांचे सरपंच, तेथील सदस्य यांच्यासह लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी. ‘प्राधिकरण नकोच’ अशी आपली भूमिका राहणार आहे.

भगवान काटे म्हणाले, प्राधिकरण म्हणजे काय, हे आम्हाला समजलेले नाही. प्राधिकरणाचे फायदे, तोटे समजून घेणे गरजेचे आहे. प्राधिकरण झाल्यास शेतकरी, सरपंचांच्या हक्कांवर गदा येणार. याबाबत खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी प्राधिकरणाला विरोध दर्शविला आहे. यावेळी उत्तम पाटील, दिनकर आडसूळ, प्रा. बी. जी. मांगले, अमर पाटील-शिंगणापूरकर, वाशीचे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, भुयेचे बाबासाहेब पाटील, आदींनी मते व्यक्त केली. बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, राजू माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण यांच्यासह बाबासाहेब देवकर, मधुकर जांभळे, आदी उपस्थित होेते. नारायण पोवार यांनी आभार मानले.सभागृहात आणला नकाशा...निगवे दुमाला (ता. करवीर) येथील दिनकर आडसूळ यांनी राजर्षी छत्रपती सभागृहात बैठकीवेळी सर्वांसमोर नकाशा आणला. त्यांनी शेतकºयांच्या जमिनीवर कशा प्रकारे आरक्षण पडणार असे विचारले.ठराव : प्राधिकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी, त्यास स्थगिती द्यावी. 

आता सरपंच  झालो आहे...प्राधिकरणाच्या बैठकीला पुलाची शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे उपस्थित होते. त्यांनी ‘आता सरपंच झालो आहे, नगरपंचायत नको’ अशी भूमिका बैठकीत मांडली.त्यावर खवरे यांना उद्देशून तसा ठराव करा, असे भगवान काटे यांनी चिमटा काढला.

 

प्राधिकरण म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी हा प्रकार आहे. ग्रामीण जनतेच्या मुळावर उठणारे हे प्राधिकरण आहे. मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणासाठी ४०० कोटी रुपये देतो, असे सांगितले होते. मात्र, एक रुपयाही त्यांनी दिलेला नाही. घरफाळा बंद झाल्यावर ग्रामपंचायती चालवायच्या कशा?, प्राधिकरण म्हणजे ग्रामपंचायती संपविण्याचा घाट आहे.- सचिन चौगले, वडणगे सरपंचप्राधिकरणाला स्वत:चे काही नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी विकून प्राधिकरण निधी उभा करणार असल्यामुळे शेतकरी भूमिहीन होऊन व ग्रामपंचायतीचे अधिकार आपोआप काढून घेतले जाणार आहेत, यासाठी सर्वांनी एकत्र लढूया.- राजू सूर्यवंशी, करवीर सभापतीप्राधिकरण होऊन आज ३५१ दिवस झाले. शंभर टक्के प्राधिकरणाला विरोध आहे. प्राधिकरणच मुळात नको, अशी ठाम भूमिका घेऊया व कार्यालयाला ठाळे ठोकूया.- शशिकांत खोत,माजी जि. प. उपाध्यक्ष