शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

आपण सारेच शिवबाचे खरे वारसदार : अमर अडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे थेट वंशज कोण, यावर वाद आहेत का, महाराज आग्रा येथून स्वराज्यात नेमके कोणत्या ...

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे थेट वंशज कोण, यावर वाद आहेत का, महाराज आग्रा येथून स्वराज्यात नेमके कोणत्या मार्गाने परतले, महाराजांच्या पश्चात त्यांच्या इतर पत्नींचे काय झाले, अशा अनेक प्रश्नांना उत्तरे देत राज्य मैत्रेय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी आपण सारेच शिवबाचे खरे वारसदार आहोत आणि आपले आयुष्य गडकिल्ल्यांशिवाय अपूर्ण आहे, असे स्पष्ट केले.

रंकाळा परिसरातील अद्वितीय अपार्टमेंटमध्ये विराजमान श्रीगणेशासमोर गणेशोत्सवनिमित्त आयोजित मुक्तचिंतन कार्यक्रमात डॉ. अडके बोलत होते. अध्यक्षस्थानी कोकण रेल्वेचे अधिकारी पी. एन. पाटील होते. प्रारंभी उपाध्यक्ष राहुल दुखंडे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमात डॉ. अडके यांनी उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.

छत्रपती शिवरायांचा मृत्यू, स्वराज्यात त्यांनी मिळविलेले किल्ले, आग्राहून सुटका, बाल संभाजी, हिरोजी इंदूलकर, मदारी म्हेतर, नेतोजी पालकर, तानाजी मालुसरे असे शिवरायांचे शिलेदार, रायगड, सिंधुदुर्ग किल्ल्यांची बांधणी करणारे स्थापत्य अभियंता, गडकिल्ल्यांबरोबरच समुद्रावर राज्य करणारा राजा, औरंगजेबाला त्याच्याच राजधानीत खडे बोल सुनावणारा एकमेव मराठा अशा अनेक पैलूंवर डॉ. अडके यांनी भाष्य केले. बालपणीच गडकिल्यांची आवड निर्माण करणारे गो. नी. दांडेकर यांच्यासह अनेकांमुळे दुर्गभ्रमंती सुरू केली. पुढेही सुरू राहील असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. अनेकांचे एकाकी जीवन दुर्ग, अरण्य भ्रमंतीमुळे सुसह्य झाले, असेही ते म्हणाले.

अलीकडे गणेशोत्सवात रेकॉर्डडान्स आणि डॉल्बीवर नृत्य करण्याचे कार्यक्रमच आयोजित केले जातात. मात्र, हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यामागे लोकप्रबोधनाचा लोकमान्य टिळकांचा हेतू कालबाह्य होत चालल्याची खंत यावेळी डॉ. अडके यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन रूपेश लोटलीकर यांनी केले होते. यावेळी अध्यक्ष सुरेश तलरेजा, सचिव सत्यजित सावंत, प्रफुल्ल गायकवाड उपस्थित होते. आनंद म्हाळुंगकर यांनी आभार मानले.

--------------------------------------------

फोटो : 17092021-Kol-Amar aadke

फोटो ओळ : रंकाळा परिसरातील अद्वितीय अपार्टमेंटमध्ये गणेशोत्सवनिमित्त आयोजित मुक्तचिंतन कार्यक्रमात डॉ. अमर अडके यांनी संवाद साधला. यावेळी पी. एन. पाटील उपस्थित होते.

170921\17kol_6_17092021_5.jpg

फोटो : 17092021-Kol-Amar aadkeफोटो ओळ : रंकाळा परिसरातील अद्वितिय अपार्टमेंटमध्ये गणेशोत्सवनिमित्त आयोजित मुक्तचिंतन कार्यक्रमात डॉ. अमर अडके यांनी संवाद साधला. यावेळी पी. एन. पाटील उपस्थित होते.