शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

‘जलयुक्त शिवार’ने शेकडो हेक्टर ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:06 IST

भुदरगड, आजरा तालुका : अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी

शिवाजी सावंत -- गारगोटी -शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जलयुक्त शिवार योजनला प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी वेगळा आयाम देऊन सव्वा कोटी रुपयांची कामे पूर्ण करून पुढील वर्षाकरिता अडीच कोटींची तरतूद करून घेतली आहे. या अभियानामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या अभियानात महसूल विभाग, कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, वरिष्ठ भूवैधानिक, भूजल सर्वेक्षण, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आणि संबंधित ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शेतकरी या सर्व घटकांचा समावेश या अभियानात करण्यात आला. या सर्व विभागांवर लक्ष ठेवून निकोप काम होण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली. या अंतर्गत माती नाला बंधारे, मजगी, शेततळी, सीसीटी, सिमेंट नाला बंधारा, वनतळे, शेततळे, बोअरवेल व विहिरी पुनर्भरण, विहिरी व छोट्या तलावांतील गाळ काढणे, जलभरण ही कामे सूचित करण्यात आली आहेत.भुदरगड आणि आजरा तालुक्यांत चांगला पाऊस पडतो; परंतु डोंगरदऱ्या आणि खराब झालेले भूपृष्ठ यामुळे पावसाचे पाणी लगेच निचरा होऊन नदीनाल्यांतून वाहून जाते. या तालुक्यातील बहुतांश भागात नदी नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. नैसर्गिक स्रोत बंद होण्याच्या मार्गावर होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला होता की, जगणे मुश्कील झाले होते. तेथे जमिनीतील पिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रश्नच नव्हता. अशी गंभीर स्थिती निर्माण झालेल्या भुदरगड तालुक्यातील भाटिवडे, आकुर्डे, आदमापूर, टिक्केवाडी, मोरेवाडी, फये, कूर ही सात गावे, तर आजरा तालुक्यातील भादवण, लाकूडवाडी, खानापूर ही तीन अशी दोन्ही तालुक्यांतील मिळून दहा गावे निवडली. दोन्ही तालुक्यांसाठी अहवाल साल २0१५ - २0१६ साठी अनुक्रमे ४४ लाख एक हजार रुपये व ८0 लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. यामध्ये सर्व ठिकाणी मिळून ४२ कामे पूर्ण केली.यावेळी प्रांताधिकारी कीर्ती नलावडे म्हणाल्या, या अभियानात असलेल्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी वर्ग यांनी मनापासून चांगले काम केले. या अभियानामुळे जमिनीची धूप थांबली. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविले गेले. पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्याची गती मंदावली. बांधाच्या प्रभावामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेततळ्यातील पाण्यामुळे पिकांना संरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे. जमिनीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. भुदरगड तालुक्यात १.0४ टीसीएम पाणीसाठा, तर आजरा तालुक्यात ४.५६१ टीसीएम साठा उपलब्ध झाला आहे. स्थानिक पातळीवरील नैसर्गिक स्रोतांचे योग्य व्यवस्थापन झाल्याने, तसेच सायफन पद्धतीने पाणी आणल्यामुळे वीज बिलाची बचत, बारमाही स्वच्छ आणि शुद्ध पाणी, गावातील घराघरांत पाणीपुरवठा होऊ शकल्याने महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. शेतीतील उत्पन्नात वाढ झाली आहे.