शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

‘जलयुक्त शिवार’ने शेकडो हेक्टर ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:06 IST

भुदरगड, आजरा तालुका : अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी

शिवाजी सावंत -- गारगोटी -शासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जलयुक्त शिवार योजनला प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी वेगळा आयाम देऊन सव्वा कोटी रुपयांची कामे पूर्ण करून पुढील वर्षाकरिता अडीच कोटींची तरतूद करून घेतली आहे. या अभियानामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, तर अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या अभियानात महसूल विभाग, कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग, वरिष्ठ भूवैधानिक, भूजल सर्वेक्षण, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, आणि संबंधित ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शेतकरी या सर्व घटकांचा समावेश या अभियानात करण्यात आला. या सर्व विभागांवर लक्ष ठेवून निकोप काम होण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची अध्यक्ष म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली. या अंतर्गत माती नाला बंधारे, मजगी, शेततळी, सीसीटी, सिमेंट नाला बंधारा, वनतळे, शेततळे, बोअरवेल व विहिरी पुनर्भरण, विहिरी व छोट्या तलावांतील गाळ काढणे, जलभरण ही कामे सूचित करण्यात आली आहेत.भुदरगड आणि आजरा तालुक्यांत चांगला पाऊस पडतो; परंतु डोंगरदऱ्या आणि खराब झालेले भूपृष्ठ यामुळे पावसाचे पाणी लगेच निचरा होऊन नदीनाल्यांतून वाहून जाते. या तालुक्यातील बहुतांश भागात नदी नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. नैसर्गिक स्रोत बंद होण्याच्या मार्गावर होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर झाला होता की, जगणे मुश्कील झाले होते. तेथे जमिनीतील पिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रश्नच नव्हता. अशी गंभीर स्थिती निर्माण झालेल्या भुदरगड तालुक्यातील भाटिवडे, आकुर्डे, आदमापूर, टिक्केवाडी, मोरेवाडी, फये, कूर ही सात गावे, तर आजरा तालुक्यातील भादवण, लाकूडवाडी, खानापूर ही तीन अशी दोन्ही तालुक्यांतील मिळून दहा गावे निवडली. दोन्ही तालुक्यांसाठी अहवाल साल २0१५ - २0१६ साठी अनुक्रमे ४४ लाख एक हजार रुपये व ८0 लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. यामध्ये सर्व ठिकाणी मिळून ४२ कामे पूर्ण केली.यावेळी प्रांताधिकारी कीर्ती नलावडे म्हणाल्या, या अभियानात असलेल्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, शेतकरी वर्ग यांनी मनापासून चांगले काम केले. या अभियानामुळे जमिनीची धूप थांबली. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविले गेले. पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्याची गती मंदावली. बांधाच्या प्रभावामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. शेततळ्यातील पाण्यामुळे पिकांना संरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध झाला आहे. जमिनीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. भुदरगड तालुक्यात १.0४ टीसीएम पाणीसाठा, तर आजरा तालुक्यात ४.५६१ टीसीएम साठा उपलब्ध झाला आहे. स्थानिक पातळीवरील नैसर्गिक स्रोतांचे योग्य व्यवस्थापन झाल्याने, तसेच सायफन पद्धतीने पाणी आणल्यामुळे वीज बिलाची बचत, बारमाही स्वच्छ आणि शुद्ध पाणी, गावातील घराघरांत पाणीपुरवठा होऊ शकल्याने महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. शेतीतील उत्पन्नात वाढ झाली आहे.