शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: June 4, 2016 00:37 IST

नागरिकांची धावपळ : ट्रान्स्फॉर्मर जळाल्याने व्यत्यय

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के.व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर जळाल्यामुळे शहरातील ए, सी व डी वॉर्डांतील पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्णपणे खंडित झाला. सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे, त्यात पुन्हा तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने नागरिकांना सलग दोन दिवस पाणी मिळाले नाही. १ एप्रिलपासून शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. याचे योग्य नियोजन झाले असल्याने पाणीटंचाईच्या काळातसुद्धा शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत आहे. परंतु, गुरुवारी सायंकाळी शहर परिसरात जोरदार वाऱ्यापाठोपाठ विजांचा कडकडाट आणि वळीव पाऊस पडल्याने बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के.व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर शॉर्टसर्किट होऊन अचानक जळाला. या अनपेक्षित घटनेने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील प्रक्रिया झालेले पाणी चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत सोडले जाते. त्यासाठी हा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला होता. चंबुखडीची टाकी रात्रभर भरली जाते आणि पहाटे तीन वाजल्यापासून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे ही टाकीच भरता आली नाही. परिणामी, शहरातील ए, सी व डी अशा तीन प्रमुख वॉर्डांना शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही. या तीन वॉर्डांत सुमारे साडेतीन ते चार लाख लोकवस्ती आहे.महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच भाड्याने घेतलेला ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे चंबुखडी येथील टाकी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आज, शनिवारपासून शहरात नियमित पाणीपुरवठा होईल, असे मनपा जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. ज्या भागात गुरुवारी पाणी मिळाले नाही, त्या भागातील नागरिकांना सलग दुसऱ्या दिवशीही पाणी मिळाले नाही. त्यामुळे उन्हाळा संपता संपता शहरवासीयांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याची झळ सोसावी लागली. दरम्यान, ज्या भागात पाणीपुरवठा झाला नाही, तेथे टॅँकरद्वारे पाणी देण्यात आले. परंतु, त्यावरही मर्यादा होत्या. (प्रतिनिधी)वळीव पावसाने बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील एक हजार के. व्ही. क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर शॉर्टसर्किट होऊन जळाला.गुरुवारी रात्रीपासूनच भाड्याने घेतलेला ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम हाती घेतले.