शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कळंब्यासह उपनगरांवर पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:53 IST

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. सध्या पाणीपातळी २० फुटांपेक्षा खाली स्थिरावली आहे. यातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट पाणीसाठा कायम ठेवावा लागतो. तलावातून ...

अमर पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा : काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भविष्यात उपनगरवासीयांसह कळंबा ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की, तलाव भरून सांडव्यावरून वाहतो. सध्या पाणीपातळी २० फुटांपेक्षा खाली स्थिरावली आहे. यातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट पाणीसाठा कायम ठेवावा लागतो. तलावातून पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्यांच्या गळत्या काढण्यासाठी पालिकेने पाणी उपश्यावर बंदी आणली आहे. महिन्याभरात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची भीषणता जाणवणार हे मात्र निश्चित.जुलै महिन्यात आठवडाभर पाऊस चांगला झाला. त्यामुळे तलावात पाणीसाठा वेगाने वाढला. मात्र त्यानंतर पावसाने चांगलीच उसंत घेतली. आता पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील वर्षी पाणी मिळणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.कळंबा तलावातून कळंबा ग्रामपंचायत १४ एचपी मोटारीद्वारे रोज दहा तास पाणी उपसा करते. उपनगरांसाठी तलावातून कळंबा फिल्टर हाऊसमध्ये चोवीस तास पाणी उपसा होतो. पुढे हे पाणी बी वॉर्ड, मंगळवार पेठेत वितरित होते. यातील पाणी सुभाषनगर पंपिंग स्टेशनमध्ये सोडून आर. के. नगर, मोरेवाडी, सुभाषनगर, वर्षानगरास वितरित होते.गतवर्षी जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातून तलावातील प्रचंड गाळाचा उपसा करण्यात आला. यंदाही मागेल त्याला गाळ योजनेंतर्गत गाळ उपसा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ उपसा होऊन पाणीसाठा क्षमता वाढली. गतवर्षी अवघ्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने तलाव पूर्ण क्षमतेने भरला; पण तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे जाणाºया माळवाडी व कात्यायनी कॉम्पलेक्स येथील जलवाहिन्यांच्या गळत्या न काढल्याने मार्चमध्ये पाणीपातळी सात फुटांवर आली. परिणामी, पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी उपसा करून कळंबा उपनगराची तहान भागविण्यात आली.सध्या महापालिकेने गळत्यांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत पाणी उपशावर बंदी आणली आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास नवीन वर्षाच्या सुरुवातीसच पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या तलावात अवघा सत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढे पाऊस न पडल्यास पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकावे लागणार अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.तलावाचे भवितव्य प्रशासनाच्या हातीकळंबा गाव पाण्यासाठी पूर्णत: पालिकेवर अवलंबून आहे. ग्रामस्थ पालिका मालकीच्या कळंबा तलावाचे अथवा पुईखडीचे पाणी वापरतात. पण तलाव प्रदूषित होऊ नये, याची काळजी कोणी घेत नाही. तलावाचा वापर जनावरे धुणे, आंघोळीसाठी होतोय. पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामांनी तलावाचा श्वास गुदमरतोय. आज तलावाचे भवितव्य ग्रामपंचायत व पालिका प्रशासनाच्या हाती आहे.