शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाणीप्रश्नी मुरगूड नगरपालिकेला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:57 IST

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही ...

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता यांच्यासह तब्बल १६ नगरसेवकांनी राजीनामे दिले, तरसंतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जाब विचारत पालिकेला टाळे ठोकले. नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. शुद्ध आणि योग्य दाबाने सुरळीत पाणीपुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंंत नगराध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना पालिकेत येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.मुरगूड शहरासह यमगे आणि शिंदेवाडी या गावांना पिण्यासाठी सर पिराजीराव तलावातून पाणी पुरवले जाते. अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी होत्या. वेळोवेळी याबाबत प्रशासनाने नागरिकांना आश्वासने दिली होती; पण या समस्येबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष होता.सोमवारी सकाळी संतप्त नागरिक नगरपालिकेच्या आवारात जमले. यावेळी नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष राजेखान जमादार हेही कार्यालयात उपस्थित होते. नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढत यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यावेळी उपनगराध्यक्ष मेंडके यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पालिकेसमोर मुख्याधिकारी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला; पण त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.यावेळी नामदेवराव मेंडके यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हट्टवादी भूमिकेमुळे गटाची बदनामी होत आहे. आम्ही सुचविलेल्या मुद्द्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करते. त्यामुळे आपण राजीनामे देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व नगरसेवक कार्यालयात गेले आणि एकत्रितपणे राजीनामा तयार करून ते गटप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले.उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, शिवाजीराव चौगले, धनाजीराव गोधडे, दीपक शिंदे, संदीप कलकुटकी, मारुती कांबळे, प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, हेमलता लोकरे, रेखा मांगले, वर्षाराणी मेंडके, रंजना मंडलिक, अनुराधा राऊत या मंडलिक गटाच्या, तर पाणीपुरवठा समितीचे सभापती रविराज परीट व विरोधी पक्ष नेते राहुल वंडकर यांनी राजीनामे दिले.टाळे टोकताना सुखदेव येरुडकर, पांडुरंग भाट, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, गुंड्या चव्हाण, युवराज सूर्यवंशी, सुनील चौगले, सर्जेराव पाटील, आबासो खराडे, भारत भाट, सुशांत मांगोरे, आनंदा मांगले, आदी उपस्थित होते.अहवालात प्रशासनावर ठपकादरम्यान, शहराला पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी, तसेच सर पिराजीराव तलावातील पाणी आणि वेदगंगा नदीतील पाणी तपासण्यासाठी बंगलोरमध्ये पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, त्यामध्ये तलावातील आणि नदीतील पाणी पिण्यास योग्य आहे, पण पालिकेच्या फिल्टरमधून शहरात जाणारे पाणी मात्र पूर्णपणे आरोग्यास घातक असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे फिल्टर हाऊसमध्येच दोष असल्याचे अधोरेखित होते.