शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

पाणीप्रश्नी मुरगूड नगरपालिकेला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:57 IST

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही ...

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता यांच्यासह तब्बल १६ नगरसेवकांनी राजीनामे दिले, तरसंतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जाब विचारत पालिकेला टाळे ठोकले. नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. शुद्ध आणि योग्य दाबाने सुरळीत पाणीपुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंंत नगराध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना पालिकेत येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.मुरगूड शहरासह यमगे आणि शिंदेवाडी या गावांना पिण्यासाठी सर पिराजीराव तलावातून पाणी पुरवले जाते. अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी होत्या. वेळोवेळी याबाबत प्रशासनाने नागरिकांना आश्वासने दिली होती; पण या समस्येबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष होता.सोमवारी सकाळी संतप्त नागरिक नगरपालिकेच्या आवारात जमले. यावेळी नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष राजेखान जमादार हेही कार्यालयात उपस्थित होते. नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढत यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यावेळी उपनगराध्यक्ष मेंडके यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पालिकेसमोर मुख्याधिकारी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला; पण त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.यावेळी नामदेवराव मेंडके यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हट्टवादी भूमिकेमुळे गटाची बदनामी होत आहे. आम्ही सुचविलेल्या मुद्द्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करते. त्यामुळे आपण राजीनामे देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व नगरसेवक कार्यालयात गेले आणि एकत्रितपणे राजीनामा तयार करून ते गटप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले.उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, शिवाजीराव चौगले, धनाजीराव गोधडे, दीपक शिंदे, संदीप कलकुटकी, मारुती कांबळे, प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, हेमलता लोकरे, रेखा मांगले, वर्षाराणी मेंडके, रंजना मंडलिक, अनुराधा राऊत या मंडलिक गटाच्या, तर पाणीपुरवठा समितीचे सभापती रविराज परीट व विरोधी पक्ष नेते राहुल वंडकर यांनी राजीनामे दिले.टाळे टोकताना सुखदेव येरुडकर, पांडुरंग भाट, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, गुंड्या चव्हाण, युवराज सूर्यवंशी, सुनील चौगले, सर्जेराव पाटील, आबासो खराडे, भारत भाट, सुशांत मांगोरे, आनंदा मांगले, आदी उपस्थित होते.अहवालात प्रशासनावर ठपकादरम्यान, शहराला पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी, तसेच सर पिराजीराव तलावातील पाणी आणि वेदगंगा नदीतील पाणी तपासण्यासाठी बंगलोरमध्ये पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, त्यामध्ये तलावातील आणि नदीतील पाणी पिण्यास योग्य आहे, पण पालिकेच्या फिल्टरमधून शहरात जाणारे पाणी मात्र पूर्णपणे आरोग्यास घातक असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे फिल्टर हाऊसमध्येच दोष असल्याचे अधोरेखित होते.