शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पाणीप्रश्नी मुरगूड नगरपालिकेला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:57 IST

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही ...

मुरगूड : मुरगूड शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत वेळोवेळी पालिका प्रशासनाला सूचना देऊनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप करीत उपनगराध्यक्ष, पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता यांच्यासह तब्बल १६ नगरसेवकांनी राजीनामे दिले, तरसंतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्षांना जाब विचारत पालिकेला टाळे ठोकले. नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. शुद्ध आणि योग्य दाबाने सुरळीत पाणीपुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंंत नगराध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना पालिकेत येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.मुरगूड शहरासह यमगे आणि शिंदेवाडी या गावांना पिण्यासाठी सर पिराजीराव तलावातून पाणी पुरवले जाते. अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याच्या तक्रारी होत्या. वेळोवेळी याबाबत प्रशासनाने नागरिकांना आश्वासने दिली होती; पण या समस्येबाबत ठोस कार्यवाही झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष होता.सोमवारी सकाळी संतप्त नागरिक नगरपालिकेच्या आवारात जमले. यावेळी नागरिकांच्या भावना समजून घेत त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष राजेखान जमादार हेही कार्यालयात उपस्थित होते. नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातून बाहेर काढत यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यावेळी उपनगराध्यक्ष मेंडके यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पालिकेसमोर मुख्याधिकारी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला; पण त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.यावेळी नामदेवराव मेंडके यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हट्टवादी भूमिकेमुळे गटाची बदनामी होत आहे. आम्ही सुचविलेल्या मुद्द्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करते. त्यामुळे आपण राजीनामे देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व नगरसेवक कार्यालयात गेले आणि एकत्रितपणे राजीनामा तयार करून ते गटप्रमुख संजय मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले.उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, शिवाजीराव चौगले, धनाजीराव गोधडे, दीपक शिंदे, संदीप कलकुटकी, मारुती कांबळे, प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, हेमलता लोकरे, रेखा मांगले, वर्षाराणी मेंडके, रंजना मंडलिक, अनुराधा राऊत या मंडलिक गटाच्या, तर पाणीपुरवठा समितीचे सभापती रविराज परीट व विरोधी पक्ष नेते राहुल वंडकर यांनी राजीनामे दिले.टाळे टोकताना सुखदेव येरुडकर, पांडुरंग भाट, किरण गवाणकर, दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, गुंड्या चव्हाण, युवराज सूर्यवंशी, सुनील चौगले, सर्जेराव पाटील, आबासो खराडे, भारत भाट, सुशांत मांगोरे, आनंदा मांगले, आदी उपस्थित होते.अहवालात प्रशासनावर ठपकादरम्यान, शहराला पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी, तसेच सर पिराजीराव तलावातील पाणी आणि वेदगंगा नदीतील पाणी तपासण्यासाठी बंगलोरमध्ये पाठविण्यात आले होते. याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असून, त्यामध्ये तलावातील आणि नदीतील पाणी पिण्यास योग्य आहे, पण पालिकेच्या फिल्टरमधून शहरात जाणारे पाणी मात्र पूर्णपणे आरोग्यास घातक असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे फिल्टर हाऊसमध्येच दोष असल्याचे अधोरेखित होते.