शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

पंचगंगेला जलपर्णीची लागण

By admin | Updated: December 26, 2014 00:53 IST

तेरवाड बंधारा : वेळीच जलपर्णी हटावची मोहीम आवश्यक

गणपती कोळी - कुरुंदवाड -पंचगंगा नदीत उन्हाळ्यात प्रदूषित पाण्याबरोबर जलपर्णीही प्रमुख समस्या बनते. उन्हाळ्यापूर्वीच नदीमध्ये जलपर्णी डोके वर काढत असून, हळूहळू नदी व्यापत आहे. तेरवाड बंधारा आदी ठिकाणी तिचे अस्तित्व दिसत आहे. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून जलपर्णी हटाव मोहीम राबविण्याची गरज आहे.पंचगंगा नदी शिरोळ, हातकणंगले तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. मात्र, या नदीकाठावर वाढलेले औद्योगिकीकरण, कोल्हापूरसह इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित बनली आहे. या नदीमध्ये उन्हाळ्यात धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने व सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाण्याचा प्रवाह वाढल्याने विशेषत: उन्हाळ्यात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनते. या दूषित पाण्याबरोबरच जलपर्णीची समस्या गंभीर बनत आहे. हिवाळ्यामध्ये जलपर्णीचे पाण्यात रोपण होऊन नदी संपूर्ण जलपर्णीने व्यापून टाकते. सुमारे चार ते पाच फूट जाडीचा थर तयार होतो. नदीत पसरलेल्या जलपर्णीच्या बियाणांचे रोपामध्ये रूपांतर होत आहे. जलपर्णी पाण्यावर येत असून, हळूहळू संपूर्ण नदी व्यापत आहे. जलपर्णीने एकदा घट्ट आवळले की, ती हटविणे शक्य होत नाही. त्यासाठी पावसाळ्यातील महापुराचीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.