शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

पंचगंगेला जलपर्णीची लागण

By admin | Updated: December 26, 2014 00:53 IST

तेरवाड बंधारा : वेळीच जलपर्णी हटावची मोहीम आवश्यक

गणपती कोळी - कुरुंदवाड -पंचगंगा नदीत उन्हाळ्यात प्रदूषित पाण्याबरोबर जलपर्णीही प्रमुख समस्या बनते. उन्हाळ्यापूर्वीच नदीमध्ये जलपर्णी डोके वर काढत असून, हळूहळू नदी व्यापत आहे. तेरवाड बंधारा आदी ठिकाणी तिचे अस्तित्व दिसत आहे. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून जलपर्णी हटाव मोहीम राबविण्याची गरज आहे.पंचगंगा नदी शिरोळ, हातकणंगले तालुक्यासाठी वरदान ठरली आहे. मात्र, या नदीकाठावर वाढलेले औद्योगिकीकरण, कोल्हापूरसह इचलकरंजी शहरातील सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित बनली आहे. या नदीमध्ये उन्हाळ्यात धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने व सांडपाणी व औद्योगिकरणाचे रसायनयुक्त सांडपाण्याचा प्रवाह वाढल्याने विशेषत: उन्हाळ्यात दूषित पाण्याची समस्या गंभीर बनते. या दूषित पाण्याबरोबरच जलपर्णीची समस्या गंभीर बनत आहे. हिवाळ्यामध्ये जलपर्णीचे पाण्यात रोपण होऊन नदी संपूर्ण जलपर्णीने व्यापून टाकते. सुमारे चार ते पाच फूट जाडीचा थर तयार होतो. नदीत पसरलेल्या जलपर्णीच्या बियाणांचे रोपामध्ये रूपांतर होत आहे. जलपर्णी पाण्यावर येत असून, हळूहळू संपूर्ण नदी व्यापत आहे. जलपर्णीने एकदा घट्ट आवळले की, ती हटविणे शक्य होत नाही. त्यासाठी पावसाळ्यातील महापुराचीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे जलपर्णीची समस्या तीव्र होण्याआधीच नदी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.