शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा रूद्रावतार

By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST

नगरसेविकेविरोधात संताप : टेंबलाईवाडीत आठवडाभर पाण्याचा ठणठणाट; रास्ता रोको, टायर पेटविल्या

कोल्हापूर : टेंबलाईवाडी परिसरासह चितोडिया भागात आठवडाभर पाण्याचा ठणठणाट झाल्याने अखेर गुरुवारी दुपारी नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात शंखध्वनी केला. टेंबलाईवाडी - उचगाव या रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको करून टायर पेटवून, भांडी ठेवून संताप व्यक्त केला. त्यामुळे या मार्गांवर सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. हा प्रकार समजताच उपमहापौर मोहन गोंजारे, प्रभागाच्या नगरसेविका रोहिणी काटे आल्या. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत येथून न हलण्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.टेंबलाईवाडी परिसरात गत दोन ते अडीच वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. विशेषत: श्रीराम कॉलनी, पाटील गल्ली, तुळजाभवानी व खतोबा कॉलनी या भागात गेल्या आठ दिवसांपासून जास्त प्रमाणात पाणीच येत नव्हते. या विरोधात गुरुवारी टेंबलाईवाडी विद्यालयाजवळ सर्व नागरिक रस्त्यावर जमले. रस्त्याच्या दुतर्फा येणारी वाहतूक बंद केली. हा प्रकार समजताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे यांच्यासह पोलीस याठिकाणी आले. त्याचबरोबर महापाािलकेचे अधिकारी व पदाधिकारीही आले. गुढीपाडव्यापासून पाणी येत नाही. अक्षरश: पाण्यासाठी भटकावे लागते, तसेच पाण्याचा टँकर येत नाही, आम्ही काय करायचे?, लोकप्रतिनिधींना सांगूनही त्याकडे ते डोळेझाक करीत आहेत, अशा व्यथा मांडत ‘आम्हाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही’ अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली. त्यावर नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले परंतु, नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उपमहापौर मोहन गोंजारे, नगरसेविका रोहिणी काटे याठिकाणी आले. १५ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन नागरिकांना काटे यांनी दिले. त्यानंतर जलअभियंता मनीष पवार घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, याच भागातील चितोडिया समाज परिसरात गेले चार दिवस पाणी येत नसल्याचा उद्रेक झाला. येथील लोकांनी रस्त्यावर टायरी पेटवून तसेच लाकडे, भांडी ठेवून आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली. रोज पहाटे तीन वाजता पाणी येते. त्यामुळे आम्ही केव्हा पाणी भरणार, अशी विचारणा पवार यांच्याकडे करीत एकही दिवस पाण्याचा टँकर येथे येत नाही, अशा तक्रारी पोटतिडकीने मांडल्या.आंदोलनात हौसाबाई कांबळे, प्रभावती बोंगाळे, सुमन घाटगे, शोभा रेडेकर, शारदा रेडेकर, जया मेथे यांच्यासह चितोडिया समाजातील सज्जनसिंग, रेश्मा भोसले, उषा भोसले, सारिका चौगुले, विजयमाला चौगुले, सचिन चौगुले, विमल चौगुले, आदींचा सहभाग होता. दरम्यान, अधिक माहिती घेण्यासाठी जलअभियंता पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.ताराराणी मार्केट कार्यालयावरही धडक...चितोडिया समाजातील महिला गुरुवारी सकाळी महापालिकेच्या कावळा नाका येथील ताराराणी मार्केट कार्यालयात पाणी येत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या; पण तेथे काही उपयोग झाला नाही. रणरागिणींनी टेंबलाईवाडी येथे उचगाव टोलनाक्यासमोर टायर पेटवून व रस्ता रोको केला.ताराराणी मार्केट कार्यालयावरही धडक...चितोडिया समाजातील महिला गुरुवारी सकाळी महापालिकेच्या कावळा नाका येथील ताराराणी मार्केट कार्यालयात पाणी येत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या; पण तेथे काही उपयोग झाला नाही. रणरागिणींनी टेंबलाईवाडी येथे उचगाव टोलनाक्यासमोर टायर पेटवून व रस्ता रोको केला.