शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पाण्यासाठी महिलांचा रूद्रावतार

By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST

नगरसेविकेविरोधात संताप : टेंबलाईवाडीत आठवडाभर पाण्याचा ठणठणाट; रास्ता रोको, टायर पेटविल्या

कोल्हापूर : टेंबलाईवाडी परिसरासह चितोडिया भागात आठवडाभर पाण्याचा ठणठणाट झाल्याने अखेर गुरुवारी दुपारी नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात शंखध्वनी केला. टेंबलाईवाडी - उचगाव या रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको करून टायर पेटवून, भांडी ठेवून संताप व्यक्त केला. त्यामुळे या मार्गांवर सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. हा प्रकार समजताच उपमहापौर मोहन गोंजारे, प्रभागाच्या नगरसेविका रोहिणी काटे आल्या. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत येथून न हलण्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.टेंबलाईवाडी परिसरात गत दोन ते अडीच वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. विशेषत: श्रीराम कॉलनी, पाटील गल्ली, तुळजाभवानी व खतोबा कॉलनी या भागात गेल्या आठ दिवसांपासून जास्त प्रमाणात पाणीच येत नव्हते. या विरोधात गुरुवारी टेंबलाईवाडी विद्यालयाजवळ सर्व नागरिक रस्त्यावर जमले. रस्त्याच्या दुतर्फा येणारी वाहतूक बंद केली. हा प्रकार समजताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे यांच्यासह पोलीस याठिकाणी आले. त्याचबरोबर महापाािलकेचे अधिकारी व पदाधिकारीही आले. गुढीपाडव्यापासून पाणी येत नाही. अक्षरश: पाण्यासाठी भटकावे लागते, तसेच पाण्याचा टँकर येत नाही, आम्ही काय करायचे?, लोकप्रतिनिधींना सांगूनही त्याकडे ते डोळेझाक करीत आहेत, अशा व्यथा मांडत ‘आम्हाला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही’ अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली. त्यावर नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले परंतु, नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उपमहापौर मोहन गोंजारे, नगरसेविका रोहिणी काटे याठिकाणी आले. १५ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन नागरिकांना काटे यांनी दिले. त्यानंतर जलअभियंता मनीष पवार घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, याच भागातील चितोडिया समाज परिसरात गेले चार दिवस पाणी येत नसल्याचा उद्रेक झाला. येथील लोकांनी रस्त्यावर टायरी पेटवून तसेच लाकडे, भांडी ठेवून आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली. रोज पहाटे तीन वाजता पाणी येते. त्यामुळे आम्ही केव्हा पाणी भरणार, अशी विचारणा पवार यांच्याकडे करीत एकही दिवस पाण्याचा टँकर येथे येत नाही, अशा तक्रारी पोटतिडकीने मांडल्या.आंदोलनात हौसाबाई कांबळे, प्रभावती बोंगाळे, सुमन घाटगे, शोभा रेडेकर, शारदा रेडेकर, जया मेथे यांच्यासह चितोडिया समाजातील सज्जनसिंग, रेश्मा भोसले, उषा भोसले, सारिका चौगुले, विजयमाला चौगुले, सचिन चौगुले, विमल चौगुले, आदींचा सहभाग होता. दरम्यान, अधिक माहिती घेण्यासाठी जलअभियंता पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही.ताराराणी मार्केट कार्यालयावरही धडक...चितोडिया समाजातील महिला गुरुवारी सकाळी महापालिकेच्या कावळा नाका येथील ताराराणी मार्केट कार्यालयात पाणी येत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या; पण तेथे काही उपयोग झाला नाही. रणरागिणींनी टेंबलाईवाडी येथे उचगाव टोलनाक्यासमोर टायर पेटवून व रस्ता रोको केला.ताराराणी मार्केट कार्यालयावरही धडक...चितोडिया समाजातील महिला गुरुवारी सकाळी महापालिकेच्या कावळा नाका येथील ताराराणी मार्केट कार्यालयात पाणी येत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या; पण तेथे काही उपयोग झाला नाही. रणरागिणींनी टेंबलाईवाडी येथे उचगाव टोलनाक्यासमोर टायर पेटवून व रस्ता रोको केला.