शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 24, 2016 01:01 IST

हॉकी स्टेडियमजवळील प्रकार : नागरिकांतून संताप; काम युद्धपातळीवर सुरू

कोल्हापूर : राज्य दुष्काळाने होरपळत असताना कोल्हापुरात मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे दररोज अनेक ठिकाणी लाखो लिटर पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. रिंगरोडवर ठिकठिकाणी लागलेल्या पाणी गळतीमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियमनजीक लागलेली गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर महानगरपालिकेने हाती घेतले आहे, त्यामुळे आयसोलेशन हॉस्पिटल, जवाहरनगर, नेहरूनगर परिसरावर त्याचा परिणाम होऊन या भागातील पाणीपुरवठा आज, रविवारीही बंद राहणार असून, तो उद्या, सोमवारी सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्य दुष्काळाच्या छायेत आहे, पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. एकेकाळी संपूर्ण कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावातील पाणी प्रथमच संपले आहे, तर राधानगरी धरणातील पाणीसाठाही जूनअखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने घेतले आहे, पण तरीही शहराच्या रिंगरोडवर मुख्य जलवाहिनीची चाळण झाल्याने त्यातून ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणची गळती काढण्यात महानगरपालिका प्रशासनाला अपयश आल्याने त्यांनी पाणी थेट गटारीत सोडले आहे. संभाजीनगर ते सायबर कॉलेजकडे जाणाऱ्या रिंगरोडवर हॉकी स्टेडियमनजीक शनिवारी सकाळी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात होते. या परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनांना पाण्यातून मार्गस्थ होताना पावसाळ्याचा भास होत होता.जाग आल्यानंतर प्रशासनाने धाव घेत या जलवाहिनीचा पाणीपुरवठा प्रथम बंद करून दुुरुस्तीचे काम सुरू केले. आज, रविवार सकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. फुलेवाडी रिंगरोडवरीलही ठिकठिकाणी लागलेली गळती काढण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शुक्रवारी नवीन वाशी नाका येथील गळती काढली.