चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीचे पाणी गेल्या चार दिवसांपासून काळे दिसत आहे. या पाण्याचा पाळीव प्राणी, जलचर व नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने पाणी अचानक काळे होण्यामागचे कारण शोधून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी, नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी स्वच्छ असणारे पाणी अचानक काळे झाले आहे. पाइपलाइनद्वारे पाणी शेतीला पुरवठा करताना दुर्गंधी येत आहे. या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना त्वचारोग उद्भवले आहेत.
पाणी नैसर्गिकरीत्या काळवंडले आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत ? याचा संबंधित विभागाने तात्काळ शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे.
-----------------------
फोटो ओळी : चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीचे गेल्या चार दिवसांपासून काळे पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
क्रमांक : २१०४२०२१-गड-१२