शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पाणीपुरवठा तीस टक्क्यांनीकमी

By admin | Updated: February 28, 2016 00:27 IST

शहरातील परिस्थिती : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी घटली ; पुरवठा विस्कळीत

कोल्हापूर : पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे दोन दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यात तीस टक्के कपात झाली असून, शहराच्या ए, बी तसेच ई वॉर्डांतील पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. उद्या, सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जलसंपदा विभागाने दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणातील पाणी भोगावती व पुढे पंचगंगा नदीत सोडले नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली. शिंगणापूर बंधाऱ्याजवळ ही पातळी कमी झाली. त्यामुळे पाणी उपसा कमी झाला. या बंधाऱ्याजवळील चार पंपांपैकी दोनच सुरू आहेत, तर कसबा बावडा येथील जलशुद्धिकरण केंद्राकडे जलवाहिनीद्वारे नेण्यात येणाऱ्या पाण्यातही पंचवीस टक्के कपात झाली. त्यामुळे पुईखडी व कसबा बावडा येथील जलशुद्धिकरण केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी वॉर्डांतील पूर्ण भाग आणि ई वॉर्डातील निम्म्या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. तेथे कमी दाबाने कमी पाणी मिळाले. राधानगरीतून ५०० क्युसेक्स पाणी सोडले असून, ते शनिवारी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत येईल. सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. टँकरने पुरवठा : दोन वॉर्डांत परिणाम नाही बालिंगा उपसा केंद्राकडे नागदेववाडी डोहातून पाणी घेण्यात आले, त्यामुळे बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. त्यामुळे ए वॉर्डाचा काही भाग तसेच सी व डी वॉर्डांतील पाणीपुरवठ्यावर कसलाही परिणाम जाणवला नाही. विशेषत: ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, त्या भागात मागणी होताच पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देण्यात येते होते. एकूण आठ टॅँकर त्यासाठी तैनात करण्यात आले होते. जरी पाणीपुरवठ्यात तीस टक्के कपात झाली असली तरी त्याची फारशी तीव्रता शहरवासीयांना जाणवली नाही.