शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बानगेकरांना सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

By admin | Updated: May 9, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील पथदर्शी प्रयोग : चाचणी यशस्वी; काळाचीगरज ओळखून पाऊल

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : गावकऱ्यांना पिण्याचे पाणी सातत्याने देता यावे, वीज बिलाचीही बचत व्हावी या उदात्त हेतूने बानगे (ता. कागल) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी योजनेच्या उपशासाठी सौरऊर्जा पंपाचा आधार घेतला आहे. सुमारे नऊ लाख रुपये खर्चून हा प्रकल्प केवळ चार महिन्यांत कार्यान्वित करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जेचा हा जिल्ह्यातील पथदर्शी प्रयोग असून, इतर गावांनाही अनुकरणीय मानला जात आहे.शासनाने १४व्या वित्त आयोगातील निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करीत संबंधित गावच्या सार्वजनिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हा निधी वापरण्याची मुभाही दिली आहे. बहुतांश गावांनी हा निधी रस्ते, गटारी, स्वच्छतेवर खर्च केला आहे. मात्र, बानगे ग्रामपंचायतीने भविष्याचा वेध घेत सौरऊर्जेचा वापर ही काळाची गरज ओळखून हे अग्निदिव्य पार करण्याचा चंग बांधला.अनेक ग्रामपंचायतीचे वीज बिल हे प्रतिमहिना ५० हजारांपासून लाखाच्या घरात जाते. त्यामुळे १० लाखांपर्यंत वीज बिल बाकी असणारी जिल्ह्यात अनेक गावे आहेत. परिणामी वीज वितरण कंपनीला वीज बिल थकीत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडित करावे लागते. त्यामुळे अनेकवेळा ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सौरऊर्जेवर गावाला पाणीपुरवठा हे स्वप्नवत वाटणारा पथदर्शी प्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे योगदान लाभले. या प्रयोगाची चाचणी यशस्वी झाली असून, नदीवरून अडीच कि़ मी. अंतरावर असणाऱ्या उंच टाकीत पाणी पोहोचले आहे. यामुळे आमचा विश्वास दृढ झाला असून, भविष्यात ३० एचपीचा परवाना घेऊन संपूर्ण पाणीपुरवठा सौरऊर्जेवरच करण्याचा मनोदय आहे. - वंदना सावंत, सरपंच बानगे ही परिस्थिती आपल्या ग्रामस्थांना येऊ नये यासाठी बानगे ग्रामपंचायतीने सौरऊर्जेवर विद्युत पुरवठा करून पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. कॉ. जीवनराव सावंत, कॉ. इंदुमती सावंत, कॉ. वसंतराव सावंत यांच्यापासून चळवळीची ऊर्जा घेतलेल्या बानगेकरांमध्ये क्रांतिकारी निर्णयाची परंपरा कायम आहे. कुस्तीपंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या या गावाने पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा राबविलेला प्रकल्पही कौतुकास्पद आहे.यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शिंदे, परवडी तसेच कागलचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, अभियंता कोळी यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा अभिनव प्रकल्प उभारणे शक्य झाले. यासाठी सरपंच वंदना रमेश सावंत, उपसरपंच बाळासाहेब सावंत, ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.