शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बानगेकरांना सौरऊर्जेवर पाणीपुरवठा

By admin | Updated: May 9, 2017 00:32 IST

जिल्ह्यातील पथदर्शी प्रयोग : चाचणी यशस्वी; काळाचीगरज ओळखून पाऊल

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : गावकऱ्यांना पिण्याचे पाणी सातत्याने देता यावे, वीज बिलाचीही बचत व्हावी या उदात्त हेतूने बानगे (ता. कागल) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी योजनेच्या उपशासाठी सौरऊर्जा पंपाचा आधार घेतला आहे. सुमारे नऊ लाख रुपये खर्चून हा प्रकल्प केवळ चार महिन्यांत कार्यान्वित करून एक धाडसी निर्णय घेतला आहे. गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जेचा हा जिल्ह्यातील पथदर्शी प्रयोग असून, इतर गावांनाही अनुकरणीय मानला जात आहे.शासनाने १४व्या वित्त आयोगातील निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करीत संबंधित गावच्या सार्वजनिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी हा निधी वापरण्याची मुभाही दिली आहे. बहुतांश गावांनी हा निधी रस्ते, गटारी, स्वच्छतेवर खर्च केला आहे. मात्र, बानगे ग्रामपंचायतीने भविष्याचा वेध घेत सौरऊर्जेचा वापर ही काळाची गरज ओळखून हे अग्निदिव्य पार करण्याचा चंग बांधला.अनेक ग्रामपंचायतीचे वीज बिल हे प्रतिमहिना ५० हजारांपासून लाखाच्या घरात जाते. त्यामुळे १० लाखांपर्यंत वीज बिल बाकी असणारी जिल्ह्यात अनेक गावे आहेत. परिणामी वीज वितरण कंपनीला वीज बिल थकीत असणाऱ्या ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन खंडित करावे लागते. त्यामुळे अनेकवेळा ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सौरऊर्जेवर गावाला पाणीपुरवठा हे स्वप्नवत वाटणारा पथदर्शी प्रयोग प्रत्यक्षात आणला आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे योगदान लाभले. या प्रयोगाची चाचणी यशस्वी झाली असून, नदीवरून अडीच कि़ मी. अंतरावर असणाऱ्या उंच टाकीत पाणी पोहोचले आहे. यामुळे आमचा विश्वास दृढ झाला असून, भविष्यात ३० एचपीचा परवाना घेऊन संपूर्ण पाणीपुरवठा सौरऊर्जेवरच करण्याचा मनोदय आहे. - वंदना सावंत, सरपंच बानगे ही परिस्थिती आपल्या ग्रामस्थांना येऊ नये यासाठी बानगे ग्रामपंचायतीने सौरऊर्जेवर विद्युत पुरवठा करून पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. कॉ. जीवनराव सावंत, कॉ. इंदुमती सावंत, कॉ. वसंतराव सावंत यांच्यापासून चळवळीची ऊर्जा घेतलेल्या बानगेकरांमध्ये क्रांतिकारी निर्णयाची परंपरा कायम आहे. कुस्तीपंढरी म्हणून नावलौकिक असणाऱ्या या गावाने पाणीपुरवठ्यासाठी सौरऊर्जेचा राबविलेला प्रकल्पही कौतुकास्पद आहे.यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शिंदे, परवडी तसेच कागलचे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, अभियंता कोळी यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा अभिनव प्रकल्प उभारणे शक्य झाले. यासाठी सरपंच वंदना रमेश सावंत, उपसरपंच बाळासाहेब सावंत, ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.