शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

सहा गावांतील पाणी प्रश्न भीषण

By admin | Updated: December 22, 2014 00:23 IST

भोगावती नदीचे प्रदूषण : प्रदूषण मंडळाचे अधिकारीही बुचकळ्यात

कोल्हापूर : दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत काल, शनिवारी सायंकाळनंतर हळदी (ता. करवीर) येथील बंधाऱ्यापर्यंत मिसळले. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. परिणामी, परिते, हळदी, कुरुकली, कोथळी, देवाळी, आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. याची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज, रविवारी पाहणी केली. प्रथमदर्शनी पाणी कशामुळे दूषित झाले आहे, हे त्यांनाही समजू शकलेले नाही. त्यामुळे नेमके कारण शोधण्यासाठी दूषित पाणी, मृत मासे यांचे नमुने घेतले आहेत. भोगावती नदीत पाणी कमी असल्यामुळे हळदी बंधाऱ्यास बरगे घातले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाणी व नदीच्या दोन्ही बाजूंच्या काठांची पाहणी केली. मात्र, मळीमिश्रित पाणी थेट नदीत मिसळल्याचे कोठेही निदर्शनास आले नसल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी केला आहे. दरम्यान, आज तवंग कायम राहून मासे मृत झाल्याने ते गोळा करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती.परिते, कुरुकली, हळदी या गावांतील सांडपाणी मोठ्या प्रमाणात थेट नदीत मिसळत आहे. यामुळेही पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. मात्र, सांडपाण्यामुळे काळा तवंग आणि व्यापक प्रमाणात मासे मृत होऊ शकत नाहीत. मळीमिश्रित पाण्यामुळेच मासे मृत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात मोठा औद्योगिक प्रकल्पही नाही. मग रसायनमिश्रित पाणी आले कोठून? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या दूषित पाण्यामुळे परिते, हळदी, आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहिरीचा आधार घेतला आहे. कोथळी, कुरुकली या गावांत आज नदीवरील जॅकवेलवरून पाणीपुरवठा केला नाही. ग्रामपंचायतीने नदीचे पाणी पिऊ नये, असे आवाहन केले आहे. उद्या, सोमवारपासून मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होणार आहे. राधानगरी धरणातून नव्याने सोडलेले पाणी हळदी बंधाऱ्यापर्यंत आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आले आहे. अशा अवस्थेत बरगे काढल्यास दूषित पाणी कोल्हापूरपर्यंत येणार आहे. परिणामी, पुन्हा नदीकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, ‘प्रदूषण नियंत्रण’चे डोके सदस्य आहेत. या दोघांनीही प्रदूषणाची पाहणी केली.