शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

सहा गावांतील पाणी प्रश्न भीषण

By admin | Updated: December 22, 2014 00:23 IST

भोगावती नदीचे प्रदूषण : प्रदूषण मंडळाचे अधिकारीही बुचकळ्यात

कोल्हापूर : दुर्गंधीयुक्त मळीमिश्रित काळे पाणी भोगावती नदीत काल, शनिवारी सायंकाळनंतर हळदी (ता. करवीर) येथील बंधाऱ्यापर्यंत मिसळले. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. परिणामी, परिते, हळदी, कुरुकली, कोथळी, देवाळी, आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. याची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज, रविवारी पाहणी केली. प्रथमदर्शनी पाणी कशामुळे दूषित झाले आहे, हे त्यांनाही समजू शकलेले नाही. त्यामुळे नेमके कारण शोधण्यासाठी दूषित पाणी, मृत मासे यांचे नमुने घेतले आहेत. भोगावती नदीत पाणी कमी असल्यामुळे हळदी बंधाऱ्यास बरगे घातले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाणी व नदीच्या दोन्ही बाजूंच्या काठांची पाहणी केली. मात्र, मळीमिश्रित पाणी थेट नदीत मिसळल्याचे कोठेही निदर्शनास आले नसल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी केला आहे. दरम्यान, आज तवंग कायम राहून मासे मृत झाल्याने ते गोळा करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती.परिते, कुरुकली, हळदी या गावांतील सांडपाणी मोठ्या प्रमाणात थेट नदीत मिसळत आहे. यामुळेही पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. मात्र, सांडपाण्यामुळे काळा तवंग आणि व्यापक प्रमाणात मासे मृत होऊ शकत नाहीत. मळीमिश्रित पाण्यामुळेच मासे मृत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात मोठा औद्योगिक प्रकल्पही नाही. मग रसायनमिश्रित पाणी आले कोठून? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या दूषित पाण्यामुळे परिते, हळदी, आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहिरीचा आधार घेतला आहे. कोथळी, कुरुकली या गावांत आज नदीवरील जॅकवेलवरून पाणीपुरवठा केला नाही. ग्रामपंचायतीने नदीचे पाणी पिऊ नये, असे आवाहन केले आहे. उद्या, सोमवारपासून मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होणार आहे. राधानगरी धरणातून नव्याने सोडलेले पाणी हळदी बंधाऱ्यापर्यंत आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत आले आहे. अशा अवस्थेत बरगे काढल्यास दूषित पाणी कोल्हापूरपर्यंत येणार आहे. परिणामी, पुन्हा नदीकाठावरील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, ‘प्रदूषण नियंत्रण’चे डोके सदस्य आहेत. या दोघांनीही प्रदूषणाची पाहणी केली.