शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

शाहूवाडीतील पाच गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: March 17, 2017 23:34 IST

ओढ्याचे दूषित पाणी : आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे ग्रामस्थांची भटकंती

राजाराम कांबळे --मलकापूर --शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे या पाच गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढेल तसे जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. गेली पंचवीस वर्षे या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ राज्यकर्त्यांनी आणली आहे. महिलांना तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गावांतर्गत येणाऱ्या वाड्यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वांत जास्त पावसाचे प्रमाण आहे. मात्र, आंबार्डे, शिराळे, आरूळ, ओकोली, करंजोशी आदी गावे डोंगराच्या जवळ वसली आहेत. या गावांतून आंबर्डी नदी वाहते. मात्र, पावसाळ््यात नदीला फक्त पाणी असते. उन्हाळ््यात नदी कोरडी असते. या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी शासनाने योजना करणे गरजेचे आहे. आंबार्डे, आरुळ, करंजोशी या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली. आंबर्डे गावात एका कूपनलिकेवर सर्व गावातील महिलांची पाण्यासाठी गर्दी होते. जनावरांना देखील नीट पाणी मिळत नाही. काम धंदा सोडून रात्रभर पाण्यासाठी कूपनलिकेवर रांगा लावाव्या लागतात. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागते. गेली अनेक वर्षे या गावांतील नागरिक पाण्यासाठी वणवरण भटकत आहेत. करंजोशी गावाशेजारून आंबार्डी नदी जात आहे. मात्र, ही नदी कोरडी पडली आहे. फक्त पावसाळ््यात या नदीला पाणी असते. दोन महिने करंजोशी गावातील महिलांना पाणी विकत घ्यावे लागते. शिराळे गावासाठी सायफन पद्धतीची पाणी योजना आहे. उन्हाळ््यात या योजनेला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागते. शासनाने या गावासाठी मंजूर केलेली पाणी योजना वादात अडकली आहे. या गावाला गटातटाच्या राजकारणामुळे कायमस्वरूपी पाणी योजना मिळत नाही. राज्यकर्त्यांचे गावागावांत दोन गट कसे निर्माण होतील याकडे त्यांचे लक्ष असते. या गावाचा विकासदेखील खुंटला आहे. पाण्याविना हजारो एकर शेती नापीक झाली आहे. पावसाळ््यात फक्त भात पीक घेतले जाते. तरुणवर्गाला पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई-पुणे येथे जावे लागते. या पाच गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी आंबार्डे येथे मंजूर असणाऱ्या पाझर तलावाचे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. पाझर तलावाच्या कामात राजकारण घुसडल्याने काम थांबले आहे. आंबार्डे गावात होणारा पाझर तलाव झाला तर शाहूवाडी, करंजोशी, आरूळ, आंबर्डे, शिराळे, ओकोली, कडेवाडी गावांतील नागरिकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय होणार आहे. माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून या पाच गावांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाझर तलावाचे काम सुरू केले आहे.-सर्जेराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य.