शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडीतील पाच गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: March 17, 2017 23:34 IST

ओढ्याचे दूषित पाणी : आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे ग्रामस्थांची भटकंती

राजाराम कांबळे --मलकापूर --शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे या पाच गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढेल तसे जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. गेली पंचवीस वर्षे या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ राज्यकर्त्यांनी आणली आहे. महिलांना तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गावांतर्गत येणाऱ्या वाड्यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वांत जास्त पावसाचे प्रमाण आहे. मात्र, आंबार्डे, शिराळे, आरूळ, ओकोली, करंजोशी आदी गावे डोंगराच्या जवळ वसली आहेत. या गावांतून आंबर्डी नदी वाहते. मात्र, पावसाळ््यात नदीला फक्त पाणी असते. उन्हाळ््यात नदी कोरडी असते. या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी शासनाने योजना करणे गरजेचे आहे. आंबार्डे, आरुळ, करंजोशी या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली. आंबर्डे गावात एका कूपनलिकेवर सर्व गावातील महिलांची पाण्यासाठी गर्दी होते. जनावरांना देखील नीट पाणी मिळत नाही. काम धंदा सोडून रात्रभर पाण्यासाठी कूपनलिकेवर रांगा लावाव्या लागतात. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागते. गेली अनेक वर्षे या गावांतील नागरिक पाण्यासाठी वणवरण भटकत आहेत. करंजोशी गावाशेजारून आंबार्डी नदी जात आहे. मात्र, ही नदी कोरडी पडली आहे. फक्त पावसाळ््यात या नदीला पाणी असते. दोन महिने करंजोशी गावातील महिलांना पाणी विकत घ्यावे लागते. शिराळे गावासाठी सायफन पद्धतीची पाणी योजना आहे. उन्हाळ््यात या योजनेला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागते. शासनाने या गावासाठी मंजूर केलेली पाणी योजना वादात अडकली आहे. या गावाला गटातटाच्या राजकारणामुळे कायमस्वरूपी पाणी योजना मिळत नाही. राज्यकर्त्यांचे गावागावांत दोन गट कसे निर्माण होतील याकडे त्यांचे लक्ष असते. या गावाचा विकासदेखील खुंटला आहे. पाण्याविना हजारो एकर शेती नापीक झाली आहे. पावसाळ््यात फक्त भात पीक घेतले जाते. तरुणवर्गाला पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई-पुणे येथे जावे लागते. या पाच गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी आंबार्डे येथे मंजूर असणाऱ्या पाझर तलावाचे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. पाझर तलावाच्या कामात राजकारण घुसडल्याने काम थांबले आहे. आंबार्डे गावात होणारा पाझर तलाव झाला तर शाहूवाडी, करंजोशी, आरूळ, आंबर्डे, शिराळे, ओकोली, कडेवाडी गावांतील नागरिकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय होणार आहे. माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून या पाच गावांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाझर तलावाचे काम सुरू केले आहे.-सर्जेराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य.