शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

शाहूवाडीतील पाच गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: March 17, 2017 23:34 IST

ओढ्याचे दूषित पाणी : आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे ग्रामस्थांची भटकंती

राजाराम कांबळे --मलकापूर --शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे, आरूळ, करंजोशी, ओकोली व शिराळे या पाच गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढेल तसे जनावरांनादेखील पाणी मिळत नाही. गेली पंचवीस वर्षे या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ राज्यकर्त्यांनी आणली आहे. महिलांना तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गावांतर्गत येणाऱ्या वाड्यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वांत जास्त पावसाचे प्रमाण आहे. मात्र, आंबार्डे, शिराळे, आरूळ, ओकोली, करंजोशी आदी गावे डोंगराच्या जवळ वसली आहेत. या गावांतून आंबर्डी नदी वाहते. मात्र, पावसाळ््यात नदीला फक्त पाणी असते. उन्हाळ््यात नदी कोरडी असते. या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी शासनाने योजना करणे गरजेचे आहे. आंबार्डे, आरुळ, करंजोशी या गावांना पाणी-पाणी करण्याची वेळ आली. आंबर्डे गावात एका कूपनलिकेवर सर्व गावातील महिलांची पाण्यासाठी गर्दी होते. जनावरांना देखील नीट पाणी मिळत नाही. काम धंदा सोडून रात्रभर पाण्यासाठी कूपनलिकेवर रांगा लावाव्या लागतात. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागते. गेली अनेक वर्षे या गावांतील नागरिक पाण्यासाठी वणवरण भटकत आहेत. करंजोशी गावाशेजारून आंबार्डी नदी जात आहे. मात्र, ही नदी कोरडी पडली आहे. फक्त पावसाळ््यात या नदीला पाणी असते. दोन महिने करंजोशी गावातील महिलांना पाणी विकत घ्यावे लागते. शिराळे गावासाठी सायफन पद्धतीची पाणी योजना आहे. उन्हाळ््यात या योजनेला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागते. शासनाने या गावासाठी मंजूर केलेली पाणी योजना वादात अडकली आहे. या गावाला गटातटाच्या राजकारणामुळे कायमस्वरूपी पाणी योजना मिळत नाही. राज्यकर्त्यांचे गावागावांत दोन गट कसे निर्माण होतील याकडे त्यांचे लक्ष असते. या गावाचा विकासदेखील खुंटला आहे. पाण्याविना हजारो एकर शेती नापीक झाली आहे. पावसाळ््यात फक्त भात पीक घेतले जाते. तरुणवर्गाला पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई-पुणे येथे जावे लागते. या पाच गावांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी आंबार्डे येथे मंजूर असणाऱ्या पाझर तलावाचे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे. पाझर तलावाच्या कामात राजकारण घुसडल्याने काम थांबले आहे. आंबार्डे गावात होणारा पाझर तलाव झाला तर शाहूवाडी, करंजोशी, आरूळ, आंबर्डे, शिराळे, ओकोली, कडेवाडी गावांतील नागरिकांना कायमस्वरूपी पाण्याची सोय होणार आहे. माजी मंत्री विनय कोरे यांच्या माध्यमातून या पाच गावांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाझर तलावाचे काम सुरू केले आहे.-सर्जेराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य.