शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पाणीबाणी; आता फक्त पिण्यासाठीच पाणी, शेतकरी चिंतेत

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 20, 2023 19:35 IST

'किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये'

कोल्हापूर : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली असून नदी, धरण व जलाशयांमधील पाणी पातळीदेखील खोल गेली आहे, त्यामुळे आता फक्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असून शेतीला पाणी देता येणार नाही तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी केले तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असून धरण व जलाशयांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तसेच उपसाबंदी जाहीर केली आहे. या परिस्थितीचा, संकटाचा सर्वांनी मिळून सामना करुया. शेतकऱ्यांनी किमान ७५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. याबाबत अधिक माहिती हवी असेल तर शंका असेल तर कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अफवा किंवा समजुतीच्या आधारावर पेरणी करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत ५ टक्के पाऊसजिल्ह्यात सरासरी १९७१.१० मिलीमीटर पाऊस होतो पण एप्रिल व मेमध्ये वळीव न झाल्याने जमिनीच्या मशागती पूर्ण झाल्या नाहीत. जूनमध्ये ३६७.९० मिलीमीटर पाऊस होतो पण आजवर फक्त १८.० मिलीमीटर म्हणजे ५ टक्केच पाऊस झाला आहे. आधीच पेरणी केली व पुरेसा पाऊस झाला नाही तर पीक धोक्यात येऊ शकते. जिरायती क्षेत्रावरील सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या पेरण्या उशिरा विलंबाने होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच भाजीपाला पिके, चारा पिके यांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७ टक्के पेरणीजिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर असून त्यात भात, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच गाळप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ९० हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये भाताची धुळपवाफ पेरणी तर शिरोळ, हातकणंगलेमध्ये उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व भुईमुगाची पेरणी केली जाते. १४ जूनपर्यंत १२ हजार ५१९ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी