शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कोल्हापूर जिल्ह्यात पाणीबाणी; आता फक्त पिण्यासाठीच पाणी, शेतकरी चिंतेत

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 20, 2023 19:35 IST

'किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये'

कोल्हापूर : पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू झाली असून नदी, धरण व जलाशयांमधील पाणी पातळीदेखील खोल गेली आहे, त्यामुळे आता फक्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असून शेतीला पाणी देता येणार नाही तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी केले तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. किमान ७० ते ७५ मिलीमीटर पाऊस होईपर्यंत पेरणी करू नका, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या जिल्ह्यात पाणीटंचाई असून धरण व जलाशयांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तसेच उपसाबंदी जाहीर केली आहे. या परिस्थितीचा, संकटाचा सर्वांनी मिळून सामना करुया. शेतकऱ्यांनी किमान ७५ मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. याबाबत अधिक माहिती हवी असेल तर शंका असेल तर कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. अफवा किंवा समजुतीच्या आधारावर पेरणी करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत ५ टक्के पाऊसजिल्ह्यात सरासरी १९७१.१० मिलीमीटर पाऊस होतो पण एप्रिल व मेमध्ये वळीव न झाल्याने जमिनीच्या मशागती पूर्ण झाल्या नाहीत. जूनमध्ये ३६७.९० मिलीमीटर पाऊस होतो पण आजवर फक्त १८.० मिलीमीटर म्हणजे ५ टक्केच पाऊस झाला आहे. आधीच पेरणी केली व पुरेसा पाऊस झाला नाही तर पीक धोक्यात येऊ शकते. जिरायती क्षेत्रावरील सोयाबीन, भुईमूग या पिकांच्या पेरण्या उशिरा विलंबाने होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर तसेच भाजीपाला पिके, चारा पिके यांच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७ टक्के पेरणीजिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर असून त्यात भात, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच गाळप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ९० हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली आहे. पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये भाताची धुळपवाफ पेरणी तर शिरोळ, हातकणंगलेमध्ये उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व भुईमुगाची पेरणी केली जाते. १४ जूनपर्यंत १२ हजार ५१९ हेक्टरवर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणीcollectorजिल्हाधिकारी