शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले पारगडवर पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST

चंदगड : ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) वरील तलाव कोरडे पडल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून पारगडवासीयांना पाण्यासाठी पायपीट ...

चंदगड :

ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) वरील तलाव कोरडे पडल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून पारगडवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीला वनविभाग व पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाची दिरंगाई कारणीभूत आहे, असा आरोप पारगड रहिवाशांनी केला असून ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

दरवर्षी मार्च ते जून महिन्यात तलाव कोरडे पडतात. त्यामुळे निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात खीळ बसते. शिवाय गडावरील रहिवाशांना पाण्याअभावी अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवते.

४८ एकर क्षेत्रांवर पसरलेला किल्ला बांधताना गडावरील रहिवाशी, मावळे व घोडदळ आदींच्या पाण्याच्या सुविधेसाठी छत्रपती शिवरायांनी १६७६ मध्ये बांधलेले गणेश, गुंजन, महादेव व फाटक हे चार तलाव व विहिरी साडेतीनशे वर्षांपासून आजतागायत सेवा देत आहेत.

तथापि, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पाणी अपुरे पडत आहे. यातील तलाव व काही विहिरींची डागडुजी करण्याची योजना वनखात्याकडे मंजूर आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर परिक्षेत्र उपवनसंरक्षक काळे यांनी गडावर भेट देऊन याची पाहणीही केली आहे. मात्र, कामाचा पत्ता नाही.

सध्या तलावात पाणी नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी डागडुजी होणे गरजेचे आहे. वनखात्याकडून चालढकल सुरू आहे, असा आरोपही रहिवाशी करत आहेत.

शासनातर्फे ‘राई’तून नळपाणी पुरवठा योजना राबविणे व किल्ल्यावरील तलाव, विहिरींची डागडुजी ही कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी किल्ल्ले पारगड रहिवाशी व पर्यटकांतून करण्यात आली आहे. ही दिरंगाई अशीच सुरू राहिल्यास तालुक्यातील दोन्ही कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कान्होबा माळवे, प्रकाश चिरमुरे, आदी पारगड रहिवाशांनी दिला आहे.

-------------------------

* पारगडवर कायमस्वरूपी उपाय म्हणून गडाच्या पूर्वेकडील राई परिसरातून पाणी आणण्यासंदर्भात योजना तयार आहे. तथापि, योजनेची कागदपत्रे पाणीपुरवठा विभाग पं. स. चंदगडकडून तीन वर्षे झाली तरी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली नाहीत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी केला आहे.

---------------------

* पारगडवर नवीन पाणी योजना कार्यान्वित व्हावी म्हणून पं. स. पाणीपुरवठा विभागाकडून योग्य ती कागदपत्रे जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवली आहेत. तथापि, वनविभागालाही जागा मंजुरीसाठी पत्रव्यवहार केला आहे.

- ए. एस. सावळगी, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पं. स. चंदगड.

-------------------------

* फोटो ओळी : पारगडवरील कोरडा पडलेला गणेश तलाव.

क्रमांक : ०४०५२०२१-गड-०६