शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
5
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
6
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
7
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
8
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
9
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
10
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
11
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
12
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
13
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
14
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
15
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
16
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
17
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
18
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
19
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
20
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   

जल पुनर्भरण परिसंवाद कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:27 IST

कसबा सांगाव : जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १७ टक्के अधिक आहे तर जमीन ही दोन टक्के तर वापरण्यायोग्य पाण्याची ...

कसबा सांगाव : जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १७ टक्के अधिक आहे तर जमीन ही दोन टक्के तर वापरण्यायोग्य पाण्याची उपलब्धता केवळ चारच टक्के आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सहा हजार घनमीटर इतके पाणी प्रतिकुटुंब उपलब्ध होते. मात्र, आज पंधराशे घनमीटर इतकेच पाणी कुटुंबाच्या वाट्याला येत आहे. त्यामुळे पाणी वाचविणे आणि त्याचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात पुढील पिढीला पाण्यावाचून तडफडावे लागेल, असा इशारा नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक प्रभातकुमार जैन यांनी दिला.

कसबा सांगाव (ता. कागल) येथे सोमवारी जलशक्ती मंत्रालय, भारत सरकारच्या मध्यक्षेत्र नागपूरच्यावतीने आयोजित ग्रामक्षेत्र भूजल सर्वेक्षण विचारविमर्श कार्यक्रमात जैन बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजित कांबळे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी जैन म्हणाले की, देशाच्या अनेक भागांमध्ये अनियमित पाऊस पडतो. त्यामुळे काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी महापुराची परिस्थिती वारंवार निर्माण होते. शेतामध्ये पिकांसाठी पारंपरिक पाट पद्धतीने ७८ टक्के तर ट्रिपल, स्पिंकलरव्दारे १२ टक्के पाणी लागते. त्यामुळे ५० टक्के पाण्याची बचत होते तसेच पिकांच्या उत्पादनातही वाढ होते. अमेरिका, चीनपेक्षा भारतात पाण्याचा उपसा जास्त आहे. पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने धरणांपेक्षाही जमिनीखाली पाणी मुरवल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.

यावेळी सरपंच रणजित कांबळे, ग्रामविकास अधिकारी एस. पी. कांबळे, बाळासो निंबाळकर यांनी पाणी बचतीबाबत मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्तविक वरिष्ठ भूजल निरीक्षक कार्तिक डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन भूजल वैज्ञानिक संदीप वाघमारे यांनी केले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या वनिता जगताप, उज्ज्वला माळी, मेहताब मुल्ला, दयानंद स्वामी, दीपक किणे, संघर्ष महिला ग्राम संघाच्या वाघमारे, क्रांती महिला संघाच्या स्वप्नाळू उपाध्ये, शिल्पा पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, डी. एम. हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------

फोटो क‌ॅप्शन : कसबा सांगाव (ता. कागल) येथे ग्रामक्षेत्र भूजल पुनर्भरण कार्यक्रमात प्रादेशिक अधिकारी प्रभातकुमार जैन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.