शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तलावातील पाणी शुद्धिकरणाची रडच

By admin | Updated: March 27, 2015 23:58 IST

व्यवस्थापनाचा अभाव : प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा; जीवरक्षक म्हणून फायरमनची नेमणूक

सचिन भोसले - कोल्हापूर  महापालिकेच्या इस्टेट विभागाकडे व्यवस्थापन असलेल्या अंबाई टँक, रमणमळा जलतरण तलाव, राजर्षी शाहू जलतरण या तिन्ही तलावांकडे तज्ज्ञ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याने या तलावांचा बोजवारा उडत आहे. जलतरण तलावांसाठी किमान तीन ते चार जीवरक्षकांची गरज असते. याचबरोबर जलतरण तलावातील पाणी नियमित स्वच्छ करावे लागते. याकरिता शुद्धिकरण प्रकल्प अर्थात व्हॉल्व असलेले पंप आहेत. यासाठी पंप आॅपरेटरची आवश्यकता असते. मात्र, तिन्ही जलतरण तलावांत पाणी शुद्धिकरणासाठी कायमस्वरुपी पंप आॅपरेटर नाहीत. त्यामुळे हे काम तेथील जीवरक्षकाचे काम करणारे किंवा तेथे सुरक्षारक्षकांनाच करावे लागते.पाणी शुद्धिकरणासाठी काही तांत्रिक बाबींसाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते; मात्र तिन्हीही जलतरण तलावात शुद्धिकरणावेळी योग्य प्रमाणात पाण्यात ब्लिचिंग पावडर वापरणे तसेच अन्य तांत्रिक बाबींचा विचार होत नाही. त्यामुळे पाण्यात कधी गाळ वरती येणे, तर कधी वाळूचे बारीक कण वर येणे असे अनेक प्रकार वारंवार होत आहेत. योग्य शुद्धिकरणाअभावी तलावात पोहायला येणाऱ्यांचे शरीर काळे पडण्याची समस्याही कायमस्वरुपी आहे. ती दूर करणे गरजेचे आहे.याशिवाय पाणी शुद्धिकरण यंत्रणेच्या व्हॉल्वची वेळेवर दुरुस्ती होत नाही. तलावावर पोहण्यास उन्हाळी सुटीत गर्दी अधिक असते. अशावेळी मुलांवर व पोहण्यास शिकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जीवरक्षकांची गरज भासते. एकावेळी तीन ते चार जीवरक्षकांची गरज असते. मात्र, तिन्ही जलतरण तलावांत दोन जीवरक्षक ठोक मानधनावर, तर एका अग्निशमन दलाच्या जवानाची नेमणूक फायरमन म्हणून रमणमळा तलावात केली आहे. सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नेमणुकाच केलेल्या नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षक किंवा जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्यांना येथील साफसफाईचे काम करावे लागते. उत्पन्न कमी, खर्च अधिकतिन्ही तलावांमधून वर्षाला अंदाजे २० लाख रुपये तिकीट रूपातून मिळतात, तर कर्मचारी पगारावर १५ लाख रुपये, तर रंगरंगोटी, फिल्टरेशन प्लँट दुरुस्ती २० लाख रुपये असे एकूण ३५ ते ४० लाख रुपये खर्च आहे. त्याचबरोबर नव्याने रमणमळा तलाववर १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे तिन्ही जलतरण तलाव इस्टेट विभागकडे आहेत. त्यामुळे जमेल तसा निधी उपलब्ध केला जातो असे उत्तर दिले जाते. राजर्षी शाहू जलतरण तलावाची देखभाल महापालिकेला जमत नसल्याने ४ लाख ११ हजारांची निविदा यंदाही मंजूर केली आहे. या तलावासाठी दोन कोटींहून अधिक खर्च केला आहे. वेळेवर दुरुस्ती देखभाल नसल्याने अंबाई टँक व राजर्षी शाहू जलतरण तलावाची दुरवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. रमणमळा तलाव केवळ नूतनीकरण केला आहे. यामध्ये जलतरण स्पर्धेचे नियम पाळले नाहीत.जीवरक्षकासाठी केवळ सातवी पासची अटचांगले तलाव असूनही देखभाल वेळेवर व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने या तलावांची दुरवस्थेकडे वाटचाल होत आहे. यात रमणमळा येथे नव्याने यंत्रणा बसविली आहे. जीवरक्षकांसाठी महापालिकेने केवळ सातवी पास व पट्टीचा पोहणारा एवढीच अट घातली आहे. त्यामुळे जीवरक्षक नेमणुकीत तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा अभाव दिसून येत आहे.