शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

तलावातील पाणी शुद्धिकरणाची रडच

By admin | Updated: March 27, 2015 23:58 IST

व्यवस्थापनाचा अभाव : प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची वानवा; जीवरक्षक म्हणून फायरमनची नेमणूक

सचिन भोसले - कोल्हापूर  महापालिकेच्या इस्टेट विभागाकडे व्यवस्थापन असलेल्या अंबाई टँक, रमणमळा जलतरण तलाव, राजर्षी शाहू जलतरण या तिन्ही तलावांकडे तज्ज्ञ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याने या तलावांचा बोजवारा उडत आहे. जलतरण तलावांसाठी किमान तीन ते चार जीवरक्षकांची गरज असते. याचबरोबर जलतरण तलावातील पाणी नियमित स्वच्छ करावे लागते. याकरिता शुद्धिकरण प्रकल्प अर्थात व्हॉल्व असलेले पंप आहेत. यासाठी पंप आॅपरेटरची आवश्यकता असते. मात्र, तिन्ही जलतरण तलावांत पाणी शुद्धिकरणासाठी कायमस्वरुपी पंप आॅपरेटर नाहीत. त्यामुळे हे काम तेथील जीवरक्षकाचे काम करणारे किंवा तेथे सुरक्षारक्षकांनाच करावे लागते.पाणी शुद्धिकरणासाठी काही तांत्रिक बाबींसाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते; मात्र तिन्हीही जलतरण तलावात शुद्धिकरणावेळी योग्य प्रमाणात पाण्यात ब्लिचिंग पावडर वापरणे तसेच अन्य तांत्रिक बाबींचा विचार होत नाही. त्यामुळे पाण्यात कधी गाळ वरती येणे, तर कधी वाळूचे बारीक कण वर येणे असे अनेक प्रकार वारंवार होत आहेत. योग्य शुद्धिकरणाअभावी तलावात पोहायला येणाऱ्यांचे शरीर काळे पडण्याची समस्याही कायमस्वरुपी आहे. ती दूर करणे गरजेचे आहे.याशिवाय पाणी शुद्धिकरण यंत्रणेच्या व्हॉल्वची वेळेवर दुरुस्ती होत नाही. तलावावर पोहण्यास उन्हाळी सुटीत गर्दी अधिक असते. अशावेळी मुलांवर व पोहण्यास शिकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी जीवरक्षकांची गरज भासते. एकावेळी तीन ते चार जीवरक्षकांची गरज असते. मात्र, तिन्ही जलतरण तलावांत दोन जीवरक्षक ठोक मानधनावर, तर एका अग्निशमन दलाच्या जवानाची नेमणूक फायरमन म्हणून रमणमळा तलावात केली आहे. सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी नेमणुकाच केलेल्या नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षक किंवा जीवरक्षक म्हणून काम करणाऱ्यांना येथील साफसफाईचे काम करावे लागते. उत्पन्न कमी, खर्च अधिकतिन्ही तलावांमधून वर्षाला अंदाजे २० लाख रुपये तिकीट रूपातून मिळतात, तर कर्मचारी पगारावर १५ लाख रुपये, तर रंगरंगोटी, फिल्टरेशन प्लँट दुरुस्ती २० लाख रुपये असे एकूण ३५ ते ४० लाख रुपये खर्च आहे. त्याचबरोबर नव्याने रमणमळा तलाववर १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे तिन्ही जलतरण तलाव इस्टेट विभागकडे आहेत. त्यामुळे जमेल तसा निधी उपलब्ध केला जातो असे उत्तर दिले जाते. राजर्षी शाहू जलतरण तलावाची देखभाल महापालिकेला जमत नसल्याने ४ लाख ११ हजारांची निविदा यंदाही मंजूर केली आहे. या तलावासाठी दोन कोटींहून अधिक खर्च केला आहे. वेळेवर दुरुस्ती देखभाल नसल्याने अंबाई टँक व राजर्षी शाहू जलतरण तलावाची दुरवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. रमणमळा तलाव केवळ नूतनीकरण केला आहे. यामध्ये जलतरण स्पर्धेचे नियम पाळले नाहीत.जीवरक्षकासाठी केवळ सातवी पासची अटचांगले तलाव असूनही देखभाल वेळेवर व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने या तलावांची दुरवस्थेकडे वाटचाल होत आहे. यात रमणमळा येथे नव्याने यंत्रणा बसविली आहे. जीवरक्षकांसाठी महापालिकेने केवळ सातवी पास व पट्टीचा पोहणारा एवढीच अट घातली आहे. त्यामुळे जीवरक्षक नेमणुकीत तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा अभाव दिसून येत आहे.