शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

म्हैसाळ योजनेचे पाणी गेले आरगपर्यंत

By admin | Updated: February 21, 2016 23:55 IST

टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा : उद्या सलगरे, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार

मिरज : म्हैसाळ योजनेतून सोडण्यात आलेले पाणी आरग येथील चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. सोमवारी सलगरे येथे पाचव्या टप्प्यापर्यंत व तेथून कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा पंपांसह तीन टप्प्यातील १४ पंपांद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. म्हैसाळ योजनेतून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे म्हैसाळ योजना शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता व पाणी टंचाईमुळे पिके धोक्यात आल्याने वसंतदादा, महांकाली, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतकऱ्यांनी ३० लाख रूपये जमा केल्यानंतर म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. या रकमेत एक महिना ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा, दुसऱ्या टप्प्यातील ४, तिसऱ्या टप्प्यातील ४ पंप सुरू करण्यात आले आहेत. उद्यापासून सलगरे येथे पाणी पोहोचल्यानंतर पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होणार आहेत. पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होताच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आणखी पंप सुरू करून पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेसाठी पाणी उपसा करण्यासाठी नदीत चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी कवठेमहांकाळपर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या टप्प्यातील १८ पंपांद्वारे प्रति सेकंद एक हजार क्युसेक्स पाण्याचा उपसा करावा लागणार असल्याचे म्हैसाळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा इतर फळबागा व पानमळे उभे केले आहेत. थकित पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडल्याने द्राक्ष व फळबागांचे नुकसान टळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. म्हैसाळ योजनेचे यापूर्वी आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ५० दिवस आवर्तन सुरू होते. मात्र सध्याच्या उन्हाळ्यात एका महिन्याचे आवर्तन अपुरे असल्याने एप्रिलअखेर आवर्तन सुरू ठेवण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.