शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे पाणी गेले आरगपर्यंत

By admin | Updated: February 21, 2016 23:55 IST

टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा : उद्या सलगरे, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार

मिरज : म्हैसाळ योजनेतून सोडण्यात आलेले पाणी आरग येथील चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. सोमवारी सलगरे येथे पाचव्या टप्प्यापर्यंत व तेथून कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी पोहोचणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा पंपांसह तीन टप्प्यातील १४ पंपांद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. म्हैसाळ योजनेतून पाणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढल्यामुळे म्हैसाळ योजना शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता व पाणी टंचाईमुळे पिके धोक्यात आल्याने वसंतदादा, महांकाली, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतकऱ्यांनी ३० लाख रूपये जमा केल्यानंतर म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. या रकमेत एक महिना ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा, दुसऱ्या टप्प्यातील ४, तिसऱ्या टप्प्यातील ४ पंप सुरू करण्यात आले आहेत. उद्यापासून सलगरे येथे पाणी पोहोचल्यानंतर पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होणार आहेत. पाचव्या टप्प्यातील पंप सुरू होताच पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आणखी पंप सुरू करून पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. म्हैसाळ योजनेसाठी पाणी उपसा करण्यासाठी नदीत चांदोली धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी कवठेमहांकाळपर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या टप्प्यातील १८ पंपांद्वारे प्रति सेकंद एक हजार क्युसेक्स पाण्याचा उपसा करावा लागणार असल्याचे म्हैसाळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा इतर फळबागा व पानमळे उभे केले आहेत. थकित पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडल्याने द्राक्ष व फळबागांचे नुकसान टळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. म्हैसाळ योजनेचे यापूर्वी आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान ५० दिवस आवर्तन सुरू होते. मात्र सध्याच्या उन्हाळ्यात एका महिन्याचे आवर्तन अपुरे असल्याने एप्रिलअखेर आवर्तन सुरू ठेवण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.