शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

राजाराम बंधाऱ्यातील पाणी पातळी १४ फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST

जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे दररोज पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. अवघ्या पंधरा दिवसांत ...

जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे दररोज पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. अवघ्या पंधरा दिवसांत पाणीपातळी ३४ फुटांवर गेली. ३९ फुटाला इशारा पातळी आहे. त्यामुळे पंचगंगेची पातळी लवकरच इशारा फुटापर्यंत पोहोचेल असे संकेत होते. मात्र अचानक पावसाने उघडीप दिली. सध्या राजाराम बंधाराच्या सर्व लोखंडी पेल्टा काढल्या असल्यामुळे बंधाऱ्याच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे.

दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र आता तब्बल दोन आठवडे झाले पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकरी आता पुन्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान कसबा बावडा परिसरात भात व ऊस पिकात साचून राहिलेले पाणी आता कमी झाले आहे. भात पिकाला मात्र आता पुन्हा पावसाची गरज आहे. बळीराजाचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.

फोटो : ०१ राजाराम बंधारा

गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने राजाराम बंधारा येथे पाणी पातळीत घट झाली आहे. सध्या बंधाऱ्याजवळ १४ फूट इतकी पाण्याची उंची आहे.

( फोटो: रमेश पाटील, कसबा बावडा )