शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरिपांवर ‘पाणी’

By admin | Updated: October 26, 2014 23:00 IST

शेतकरी चिंताग्रस्त : पीक काढणी ठप्प; परतीचा मान्सून कोसळला

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शनिवारी दुपारी दीडपर्यंत परतीचा मान्सून कोसळत राहिला. यामुळे खरीप पिकांवर ‘पाणी’ पडले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पीक काढणी ठप्प झाली. याउलट रब्बी पिकांच्या पेरणीला पाऊस उपयुक्त ठरला. रब्बी पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकालाही हा पाऊस पोषक ठरला आहे. यंदा जुलै महिन्यात दमदार पावसाला प्रारंभ झाला. तब्बल एक महिना उशिरा सर्वच पिकांची पेरणी झाली. परिणामी खरिपांची पिकेही एक महिना उशिरा म्हणजे आता परिपक्व झाली. सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांच्या काढणीचा हंगाम वेगात सुरू आहे. पीक काढणी- पाठोपाठ मळणीही केली जात आहे. सोयाबीन व ज्वारीची मळणी यंत्रावर केली जात आहे. भात पिकाची मळणी डांबरी रस्त्यावर किंवा शेतातच ते बडवून काढले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र आकाशात ढग दाटून आल्याने पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले. रात्री आठनंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. आज दुपारी दीडपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. कापणी करून मळणीसाठी ठेवलेले पीक पावसाने भिजले. पिकांचे ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून पावसापासून संरक्षण करण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत; मात्र पाऊस जोराचा असल्यामुळे रचून ठेवलेले पीक भिजले. परिपक्व झालेले मात्र कापणी न झालेले भात पीक शेतातच जमीनदोस्त झाल्यामुळे नुकसान झाले आहे. जमिनीत ओल झाल्याने वापसा आल्यानंतर काढणीच्या कामाला पुन्हा प्रारंभ करावी लागणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाने उघडीप दिली. जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यामुळे बळिराजाने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित केले आहे. रब्बी हरबरा, गहू, शाळू यांची पेरणी केली जात आहे. पेरणीला पाऊस अतिशय पोषक ठरला. याशिवाय गेल्या आठवड्यात पेरणी होऊन उगवून आलेल्या रब्बी पिकांच्या वाढीसाठीही पाऊस उपयुक्त आहे. दुसऱ्या बाजूला रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीचे काम ठप्प झाली. आॅक्टोबर हिट सुरू झाल्यामुळे ऊस पीक वाळत होते. यामुळे शेतकरी विहिरीतील उसाला पाणी देत होता. आता पावसामुळे एक पाण्याचा फेर देणे वाचणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पावसामुळे खूश आहे. (प्रतिनिधी)