शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

जिल्ह्यात खरिपांवर ‘पाणी’

By admin | Updated: October 26, 2014 23:00 IST

शेतकरी चिंताग्रस्त : पीक काढणी ठप्प; परतीचा मान्सून कोसळला

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शनिवारी दुपारी दीडपर्यंत परतीचा मान्सून कोसळत राहिला. यामुळे खरीप पिकांवर ‘पाणी’ पडले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पीक काढणी ठप्प झाली. याउलट रब्बी पिकांच्या पेरणीला पाऊस उपयुक्त ठरला. रब्बी पेरणीला वेग आला आहे. ऊस पिकालाही हा पाऊस पोषक ठरला आहे. यंदा जुलै महिन्यात दमदार पावसाला प्रारंभ झाला. तब्बल एक महिना उशिरा सर्वच पिकांची पेरणी झाली. परिणामी खरिपांची पिकेही एक महिना उशिरा म्हणजे आता परिपक्व झाली. सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांच्या काढणीचा हंगाम वेगात सुरू आहे. पीक काढणी- पाठोपाठ मळणीही केली जात आहे. सोयाबीन व ज्वारीची मळणी यंत्रावर केली जात आहे. भात पिकाची मळणी डांबरी रस्त्यावर किंवा शेतातच ते बडवून काढले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र आकाशात ढग दाटून आल्याने पावसाळ्याप्रमाणे वातावरण झाले. रात्री आठनंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. आज दुपारी दीडपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. कापणी करून मळणीसाठी ठेवलेले पीक पावसाने भिजले. पिकांचे ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून पावसापासून संरक्षण करण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत; मात्र पाऊस जोराचा असल्यामुळे रचून ठेवलेले पीक भिजले. परिपक्व झालेले मात्र कापणी न झालेले भात पीक शेतातच जमीनदोस्त झाल्यामुळे नुकसान झाले आहे. जमिनीत ओल झाल्याने वापसा आल्यानंतर काढणीच्या कामाला पुन्हा प्रारंभ करावी लागणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाने उघडीप दिली. जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यामुळे बळिराजाने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित केले आहे. रब्बी हरबरा, गहू, शाळू यांची पेरणी केली जात आहे. पेरणीला पाऊस अतिशय पोषक ठरला. याशिवाय गेल्या आठवड्यात पेरणी होऊन उगवून आलेल्या रब्बी पिकांच्या वाढीसाठीही पाऊस उपयुक्त आहे. दुसऱ्या बाजूला रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीचे काम ठप्प झाली. आॅक्टोबर हिट सुरू झाल्यामुळे ऊस पीक वाळत होते. यामुळे शेतकरी विहिरीतील उसाला पाणी देत होता. आता पावसामुळे एक पाण्याचा फेर देणे वाचणार आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी पावसामुळे खूश आहे. (प्रतिनिधी)