शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते कामातील दुर्लक्षामुळे शेतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST

दिंडनेर्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे होत असलेल्या रस्त्याच्या कामात अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा व ठेकेदाराच्या मनमानी ...

दिंडनेर्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे होत असलेल्या रस्त्याच्या कामात अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमिनीचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दिंडनेर्ली गावच्या पाझर तलावापासून गावातील रेणुका मंदिरापर्यंत शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून १ कोटी २६ लाख रुपये निधीचा २ कि.मी. अंतराचा रस्ता करण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. सध्या या रस्त्याच्या ठिकाणी खडीकरण झाले असून पावसामुळे काम थांबले आहे पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याच्या बाजूचे गटर करावीत, अशी सूचना केली होती, वारंवार मागणी करूनदेखील सर्वांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली होती. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूस गटर नसल्यामुळे सरळ पावसाचे पाणी काशिनाथ पाटील तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने अंदाजे पाच ते सहा एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच एक एकरातील वांगी, मिरची, दोडका याचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी ही याच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे, ठेकेदाराकडे गटर करण्याची विनंती केली होती. पण मागील वर्षीही गटर न केल्यामुळे नुकसान झाले होते, पण रस्ता होऊन शेतकऱ्यांची सोय होणार असल्यामुळे मागील वर्षी कुठलीही तक्रार न करता सर्व शेतकऱ्यांनी नुकसान सोसले होते.

दोन महिन्यांपूर्वी भागातील शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कार्यकारी अभियंता यांच्याकडे आहेत. लेखी तक्रार केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्या तक्रारीची दखल घेऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटर काढले असते तर आज शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले नसते, असे काशिनाथ पाटील यांनी सांगितले.