शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रस्ते कामातील दुर्लक्षामुळे शेतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST

दिंडनेर्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे होत असलेल्या रस्त्याच्या कामात अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा व ठेकेदाराच्या मनमानी ...

दिंडनेर्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे होत असलेल्या रस्त्याच्या कामात अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमिनीचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दिंडनेर्ली गावच्या पाझर तलावापासून गावातील रेणुका मंदिरापर्यंत शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून १ कोटी २६ लाख रुपये निधीचा २ कि.मी. अंतराचा रस्ता करण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. सध्या या रस्त्याच्या ठिकाणी खडीकरण झाले असून पावसामुळे काम थांबले आहे पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याच्या बाजूचे गटर करावीत, अशी सूचना केली होती, वारंवार मागणी करूनदेखील सर्वांनाच उडवाउडवीची उत्तरे दिली होती. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूस गटर नसल्यामुळे सरळ पावसाचे पाणी काशिनाथ पाटील तसेच इतर शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने अंदाजे पाच ते सहा एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तसेच एक एकरातील वांगी, मिरची, दोडका याचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी ही याच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे, ठेकेदाराकडे गटर करण्याची विनंती केली होती. पण मागील वर्षीही गटर न केल्यामुळे नुकसान झाले होते, पण रस्ता होऊन शेतकऱ्यांची सोय होणार असल्यामुळे मागील वर्षी कुठलीही तक्रार न करता सर्व शेतकऱ्यांनी नुकसान सोसले होते.

दोन महिन्यांपूर्वी भागातील शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराच्या विरोधात कार्यकारी अभियंता यांच्याकडे आहेत. लेखी तक्रार केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले त्या तक्रारीची दखल घेऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटर काढले असते तर आज शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले नसते, असे काशिनाथ पाटील यांनी सांगितले.