शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पिकांना मेमध्ये एकदाच पाणी!

By admin | Updated: April 30, 2016 00:56 IST

‘पाटबंधारे’चे नियोजन : उर्वरित साठा ३० जूनपर्यंत पिण्यासाठी राखीव

कोल्हापूर : उन्हाळी हंगामातील मे महिन्यातील सिंचनासाठी देण्यात येणारे एकच आवर्तन एक मेपासून दहा मेपर्यंत चालू करण्याचे आदेश सिंचन विभागामार्फत देण्यात आले आहेत. त्यामुळे एका बाजूला उन्हाचा लाही- लाही उडविणारा तडाखा व पिकांना मात्र महिन्यांत एकदाच पाणी, अशी स्थिती उद्भवणार आहे. त्याचा पिकांच्या वाढीवर व जगण्यावरही मोठा गंभीर परिणाम होणार आहे. आता दहा दिवसांची उपसा बंदी असतानाच पिके वाळू लागल्याची तक्रारी आहेत. त्यात आणखी भर पडणार आहे.साधारणत: आताच्या नियोजनानुसार दहा ते जास्तीत जास्त पंधरा मेपर्यंतच पिकांना पाणी देता येईल. त्यानंतर पाणी देता येणार नाही. मे महिन्याच्या अखेरीस चांगला वळीव झाला, तर या निर्णयाचा फेरविचार होऊ शकेल. आता उपलब्ध पाणीसाठा आणि तीस जूनपर्यंतचे पिण्यासाठी लागणारे पाणी याचा विचार करून पाटबंधारे विभागाने हे नियोजन केले आहे. प्रशासनाला नेहमीच पिण्याच्या पाण्यास अधिक प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे असा निर्णय घेणे भाग पडले आहे.गतवर्षीच्या पावसाळी हंगामात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी झालेल्या पर्जन्यमानामुळे भोगावती व पंचगंगा खोऱ्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी प्रकल्पात शंभर टक्के, तर दूधगंगा जलाशयात ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाळ्यातील अवषर्णामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी सरासरीपेक्षा जादा पाणी वापर होत असल्याचे निदशर्नास आल्यावर जानेवारी २०१६ पासून आठ दिवसांची उपसा बंदी लागू केली होती. लोकाग्रहास्तव ही उपसा बंदी मार्चअखेर प्रत्यक्षात पाच दिवस राबवावी लागली. एप्रिलमध्ये दहा दिवसांची उपसा बंदी लागू करण्यात आली होती. दि. १४ एप्रिलच्या पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन मे महिन्यात सिंचनासाठी एक आवर्तन देण्यात यावे व उर्वरित पाणी तीस जूनअखेर पिण्यासाठी पुरवावे, असे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे उन्हाळी हंगामातील मे महिन्यातील सिंचनासाठी देण्यात येणारे एकच आवर्तन एक मेपासून दहा मेपर्यंत चालू करण्याचे आदेश सिंचन विभागामार्फत देण्यात आले आहेत. याची भोगावती व पंचगंगा खोऱ्यातील लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. आतापर्यंत आपण शेतीसाठी महिन्याला दोन आवर्तने देत होतो; परंतु यंदाच्या हंगामात हिवाळ््यापासूनच पाण्याचा उपसा आजपर्यंतच्या मागच्या काही वर्षांपेक्षा जास्त झाला आहे. कमी पावसामुळे तहानलेली जमीन हे त्याचे मुख्य कारण आहे. यापूर्वी एका आवर्तनावेळी जिल्ह्यास सरासरी १२०० ते १४०० दशलक्ष घनफूट पाणी लागत होते. ते आता दीड टीएमसीपेक्षा जास्त लागत आहे. याचा विचार करूनच उपसा बंदीचा निर्णय घेतला आहे.- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर