शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

‘धोम-बलकवडी’चे पाणी पोहोचले गिरवीत !

By admin | Updated: April 20, 2015 00:23 IST

अखेर स्वप्नपूर्ती : रखरखीत माळ भिजल्याने फलटण तालुक्याच्या पूर्व भागात जल्लोष

वाठार निंबाळकर : फलटण तालुक्याच्या दुष्काळी पूर्व भागाला ‘धोम-बलकवडी’चे पाणी मिळावे हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे स्वप्न आणि ‘चिमणरावांच्या डाळिंबाच्या बागेला मीच पाणी देणार,’ हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांचे शब्द रविवारी सत्यात उतरले. कोरड्या रखरखीत माळावर कालव्यातून पाणी खेळले आणि गिरवीकरांनी जल्लोष केला.गिरवी (ता. फलटण) हे माजी आमदार चिमणराव कदम यांचे गाव. त्यांनी या कायम दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळावे म्हणून त्याकाळी वारंवार जिकिरीचे प्रयत्न केले. १९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हाच दुष्काळी भागाच्या पाण्याचा मुद्दा घेऊन विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यात त्यांना घवघवीत यश मिळाले. ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला मीच पाणी देणार,’ असा शब्द निवडणूक प्रचारात रामराजे वारंवार देत असत.१९९५ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या स्थापनेसाठी आमदारांची गरज होती. ती पूर्ण करण्याच्या बदल्यात धोम-बलकवडी व नीरा-देवघर धरणे पूर्ण करण्याची अट रामराजेंनी ठेवली. हे पाणी आदर्कीपर्यंत आले. या ठिकाणी माजी आमदार चिमणराव कदम, शंकरराव जगताप व माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करून रामराजेंनी वेगळेपण दाखविले. बिबी आणि वाघोशी येथे जलपूजन झाल्यानंतर पुढे बाणगंगा नदीत पाणी सोडून पुन्हा जलपूजन झाले. अशा रीतीने तालुक्यात पाच वेळा जलपूजन झाले. मात्र, गिरवी येथे पाणी येण्यास विलंब लागला.रविवारी पाणी गिरवी गावच्या परिसरात पोहोचले आणि गिरवीकरांची प्रतीक्षा संपली. सध्या धोम-बलकवडी कालव्याच्या एकूण १४७ किलोमीटर अंतरापैकी फलटण तालुक्याच्या हद्दीतील १२२ किलोमीटरपर्यंतची कामे पूर्ण झाली असून, गिरवीकरांची पाण्याची गरज विचारात घेऊन उपलब्ध पाणी गिरवी नळपाणी पुरवठा योजनेच्या तलावात सोडण्यात आले आहे.गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी विलंब लागण्याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता, शेतकऱ्यांच्या अडचणी येत होत्या; मात्र संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी या अडचणी सोडविण्यास मदत केली.तुळजाभवानीला अभिषेकगिरवीच्या शिवारात आलेले पाणी घेऊन गिरवीकर पहाटेच तुळजापूरला गेले. या पाण्याने त्यांनी भवानीमातेला अभिषेक केला. तथापि, गिरवीत पाणी आल्याचे पाहण्यास चिमणराव कदम हवे होते, अशी हळहळ व्यक्त करताना ग्रामस्थांचे डोळे ओलावले होते.