शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

हलकर्णी पूर्व भागात पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: October 14, 2015 00:13 IST

पावसाअभावी पिकांचे नुकसान : सोयाबीन, भुईमूग उत्पादनात पन्नास टक्क्यांहून अधिक घट

एम. ए. शिंदे -- हलकर्णी परिसर हा गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील भाग. तालुक्याच्या पश्चिम भागातच गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्यामुळे पूर्व भाग तसा यंदा कोरडाच राहिला. परतीच्या पावसानेसुद्धा पाठ फिरल्यामुळे हलकर्णी परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जूनमध्ये पावसाने कधी नव्हे ती दमदार एंट्री केली होती. वेळेत पेरण्या पूर्ण होऊन पिकांची उगवणही चांगली झाली होती. त्यामुळे बळिराजा सुखावला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. शेतकऱ्यांनी जिवापाड कष्ट करून कशी पिके हाताला लागतील हेच पाहिले. आता भात पिकाची पोटरी गळ्यात अडकली आहे. कडक उन्हामुळे जमिनीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. आॅक्टोबर हिटला सुरुवात झाली सोयाबीन आणि भुईमूग ही या भागातील आर्थिक पिके आहेत, पण अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात पन्नास टक्क्यांहून अधिक घट झाली.हलकर्णी परिसरात तेरणी, नरेवाडी, येणेचवंडी हे तीन प्रकल्प आहेत. यापैकी येणेचवंडी हा लघु प्रकल्प जवळजवळ कोरडाच पडला आहे. येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच लघुप्रकल्पावर बसर्गे, नौकुड, येणेचवंडी येथील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. प्रकल्पात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. हलकर्णीपासून जवळच इदरगुच्ची हे गाव आहे. या गावाला या नदीचा व लघु प्रकल्पाचा आधार आहे. तेरणी लघु प्रकल्पात साठवण क्षमतेच्या जवळपास पन्नास टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातील पाण्यावर तेरणी आणि बुगडीकट्टी येथील नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. नरेवाडी लघु प्रकल्पावर बसर्गे आणि नरेवाडी नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे.विविध राजकीय पक्ष, संघटना यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मोर्चे-आंदोलने केली. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर निवेदने स्वीकारण्यापलीकडे काहीच परिणाम झाला नाही. उपलब्ध पाण्याचा वापर भात, सोयाबीन, भुईमूग, मिरची या पिकांसाठीच शेतकऱ्यांनी केल्यामुळे यंदा ऊस पिकालासुद्धा अपुराच पाणीपुरवठा झाला आहे. नरेवाडी धरणात कायमस्वरूपी पाणीसाठा होण्यासाठी शासनाने नवीन स्रोत शोधावेत. पिण्याचे आणि शेतीचे पाणी प्रश्न गंभीर बनले आहेत. शासनाने ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना मदत द्यावी. हरळी कारखान्यापासून कालवा काढल्यास पूर्व भागातील २२ खेड्यांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. चित्री बंधाऱ्यात ८० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने उभ्या असलेल्या ऊस पिकाचा विचार करावा व उपसाबंदीचा आताच विचार करू नये. - जयकुमार मुन्नोळी, जि. प. सदस्य