शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

हलगर्जीपणामुळे नागरिकांना दूषित पाणी

By admin | Updated: October 5, 2015 00:50 IST

चंदगड पंचायत सभा : प्रशासनावर आरोप; वनविभाग धारेवर; हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी

चंदगड : प्रशासनाच्या जबाबदारी झटकून टाकण्याच्या वृत्तीमुळे चंदगडसह तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून संबंधित विभागांनी समन्वयाने हा प्रश्न सोडवून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे खडेबोल रविवारी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत संबंधित विभागांना सुनावण्यात आले. सभापती ज्योती पवार-पाटील अध्यक्षस्थानी होत्या.गटविकास अधिकारी एस. डी. डवरी यांनी स्वागत केले. विषयपत्रिकेनुसार विस्तार अधिकारी गजगेश्वर यांनी तालुका आरोग्य विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी चंदगडसह तालुक्यातील अनेक गावांचे पाणी दूषित असताना केवळ कागदोपत्री शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याचे दाखवले जाते, असा गंभीर आरोप सदस्य अनिल सुरूतकर व उपसभापती शांताराम पाटील यांनी करत संबंधित विभागाला धारेवर धरले. त्यावर गजगेश्वर यांनी शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी केवळ आरोग्य विभागाची नसून ग्रामपंचायत व नळपाणीपुरवठा विभागही त्यासाठी जबाबदार असल्याचे सांगितले. त्यावर पाणीपुरवठा व ग्रामपंचायत विभागाने एकमेकांकडे बोट दाखवून दूषित पाणीपुरवठा होण्यास आपला विभाग जबाबदार नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर संबंधित विभागांनी समन्वयाने हा प्रश्न हाताळून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे सुनावण्यात आले. वनविभागाचा अहवाल बावरा यांनी सादर केला. यावेळी पावसाअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच जांबरे-उमगाव परिसरात हत्तींकडून मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांचे नुकसान केले जात आहे. वारंवार हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी करून वनविभाग तसेच शासनाकडून ठोस उपाययोजना राबवली जात नाही. त्यामुळे लोकांच्या उद्रेकाची वाट शासन पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित करून कोणतीही कारणे न सांगता तातडीने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शांताराम पाटील यांनी केली.प्र. शाखा अभियंता ए. एस. सावळगी यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी तालुक्यातील सहा मंडळांत पडलेल्या पावसावरून तालुक्यात झालेल्या सरासरी पावसाची आकडेवारी सादर केली. त्यावर सुरूतकर यांनी आक्षेत घेत तालुक्यातील अनेक भागात पाऊसच झालेला नाही; परंतु सरासरी आकडेवारीवरून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसते; परंतु हे चुकीचे आहे. शासनाला विभागवार आकडेवारी कळवावी आणि दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली. ग्रामीण आरोग्य विभागाचा अहवाल डॉ. साने यांनी सादर केला. यावेळी शांताराम पाटील यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, आरोग्य विभागाकडे त्यावर देण्यात येणारी ‘रेबीज’ लस उपलब्ध नसल्याने तसेच चंदगड तालुका जिल्ह्यापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे याची नोंद घेऊन कोणतीही कारणे न सांगता रेबीज लस तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करावी, अशी सूचना केली. एनआरएचएचचा काही निधीही लस खरेदीसाठी वापरावा, असे गटविकास अधिकारी डवरी यांनी सांगितले. सदस्या तुळसा तरवाळ यांनी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तेथील कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचे सांगितले. जांबरे धरणातील पाणी सोडू नयेयंदा सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती आहे. चंदगड तालुकाही त्याला अपवाद नाही. तालुक्यातील धरणातील पाणीसाठा पाहता मार्च-एप्रिलमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे ताम्रपर्णी नदीतील पाणीसाठा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या सहमतीने जांबरे धरणातील पाणी ताम्रपर्णी नदीत सोडावे. धरणाच्या दुरुस्तीचे काम पुढे करून धरणात साठवलेले पाणी आताच सोडू नये, अशी मागणी शांताराम पाटील यांनी केली.