शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापर वाढेल तसे दरही वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : वीस हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर करणाऱ्या नळ कनेक्शनधारकांना वगळून त्यापुढे वापर करणाऱ्या घरगुती, बिगर घरगुती तसेच ...

कोल्हापूर : वीस हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर करणाऱ्या नळ कनेक्शनधारकांना वगळून त्यापुढे वापर करणाऱ्या घरगुती, बिगर घरगुती तसेच औद्योगिक नळ कनेक्शनधारकांना महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा झटका दिला. तब्बल आठ वर्षानी झालेल्या दरवाढीचे समर्थन करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तसेच आसपासच्या ग्रामीण भागाच्या तुलनेत हे दर निम्मेच असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पाणीवापर वाढेल तसे त्याचे दर वाढतील हे सूत्र पकडून ही दरवाढ करण्यात आली आहे.

शहरातील साठ टक्के नळ कनेक्शनधारकांना पाणीपट्टी वाढीचा फटका बसणार असून चाळीस टक्के नळ कनेक्शनधारकांना कसलीही दरवाढ होणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पहिल्या वीस हजार लिटरपर्यंत पाणी वापरणाऱ्या चाळीस टक्के नळ कनेक्शनधारकांना जुन्याच म्हणजे नऊ रुपये ५० पैशाने आकारणी होणार आहे. परंतु २०,००१ ते ४०,००० लिटरपर्यंत पाणी वापरणाऱ्यांना प्रति हजारी १ रुपया १५ पैसे जादा मोजावे लागणार आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्यांना प्रतिहजारी तीन रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच बिगर घरगुती कनेक्शनधारकांना

सहा रुपये, तर औद्योगिक नळ कनेक्शनधारकांना नऊ रुपये जादा मोजावे लागतील.

शहरात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गळतीकडे दुर्लक्ष करून शहरातील साठ टक्के नळ कनेक्शनधारकांवर दरवाढ लादली आहे. पाणी गळती, पाणीचोरी यामुळे प्रत्येक वर्षी पाणीपुरवठा विभागाला ३१ कोटी ३५ लाखाची तूट येते. ती भरून काढण्यासाठी ही दरवाढ केली असून त्यातून वर्षाला सहा कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असे सांगण्यात आले. गेल्या आठ वर्षांत पाणीपट्टी दरवाढ करण्यात आलेली नव्हती. विद्युत बिल, देखभाल दुरुस्ती, रॉ वॉटर बिगरसंचन पाणीपट्टीतील वाढ, आस्थापना खर्च व इतर आनुषंगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागली, असे प्रशासन सांगते.

तक्ता-

वापर प्रकार वापर मर्यादा प्रचलित दर नवीन दर

१.घरगुती - ० ते २० हजार लिटर : ९.५० रुपये ९.५० रुपये

२० ते ४० हजार लिटर : ११.५० रुपये १२.६५ रुपये

४० हजाराच्या वर लिटर : १५.०० रुपये १८.०० रुपये

२. बिगर घरगुती --- ४०.०० रुपये ४६.०० रुपये

३. औद्योगिक ---- ६५.०० रुपये ७४.७५ रुपये

कोट -

पाणीपट्टी दर वाढवून आम्हाला नागरिकांना त्रास द्यायचा नाही; परंतु पाण्याचा वापर योग्य व्हावा हा हेतू आहे. पालिकेचे पाण्याचे दर हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापेक्षा पन्नास टक्के कमी आहेत.

डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक

-अन्य कोणतीही करवाढ नाही -

पाणीपट्टी वगळता घरफाळा, परवाना शुल्क, नगररचना, केएमटी, आरोग्य, इस्टेट, वाचनालय याकडील दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अग्निशमन सेवा तसेच केशवराव भोसले नाट्यगृहात अंशत: दरवाढ केली आहे. नाट्यगृहासाठी काही प्रयोगासाठी १० टक्के सवलतही देण्यात आली आहे.