शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

गडमुडशिंगीत गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 18, 2015 00:12 IST

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : जिल्हा परिषद सदस्यांची सूचनाही हवेतच, पाणीटंचाईमुळे नागरिकांतून मात्र संताप

गांधीनगर : महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट आहे. पाण्याची कमतरता असली, तरी काही तांत्रिक बाबींमुळेही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गडमुडशिंगी (ता. करवीर)सह सात गावांतही हीच परिस्थिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असून, त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.गडमुडशिंगी, गांधीनगर, वसगडे, वळिवडे, चिंचवाड, न्यू वाडदे या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन आहे. गडमुडशिंगी ते वसगडे या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र बँकेजवळच पाईप फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी यांनीही ‘एमजीपी’च्या अधिकाऱ्यांना गळतीबाबत सांगितले; पण कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. स्थानिकांनी याबाबतची कल्पना देऊनही प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने येऊन गळती काढण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. त्यामुळे काही गावांना ऐन उन्हाळ््यात पाण्याची उपलब्धता असूनही पाणीटंचाईची झळ बसत आहे. अशा अनेक गळत्या जिल्ह्यातील काही योजनांना लागल्या आहेत. त्या जरी प्रशासनाने गांभीर्याने बंद केल्या, तर पाणीटंचाईवर थोडीफार मात करता येईल, हे उघड सत्य आहे; पण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली पाहिजे, अशी भावना काही नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. या गळतीमुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरत असून, याचा त्यांना त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ही गळती ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.