शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

गडमुडशिंगीत गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 18, 2015 00:12 IST

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : जिल्हा परिषद सदस्यांची सूचनाही हवेतच, पाणीटंचाईमुळे नागरिकांतून मात्र संताप

गांधीनगर : महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट आहे. पाण्याची कमतरता असली, तरी काही तांत्रिक बाबींमुळेही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गडमुडशिंगी (ता. करवीर)सह सात गावांतही हीच परिस्थिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असून, त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.गडमुडशिंगी, गांधीनगर, वसगडे, वळिवडे, चिंचवाड, न्यू वाडदे या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन आहे. गडमुडशिंगी ते वसगडे या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र बँकेजवळच पाईप फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी यांनीही ‘एमजीपी’च्या अधिकाऱ्यांना गळतीबाबत सांगितले; पण कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. स्थानिकांनी याबाबतची कल्पना देऊनही प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने येऊन गळती काढण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. त्यामुळे काही गावांना ऐन उन्हाळ््यात पाण्याची उपलब्धता असूनही पाणीटंचाईची झळ बसत आहे. अशा अनेक गळत्या जिल्ह्यातील काही योजनांना लागल्या आहेत. त्या जरी प्रशासनाने गांभीर्याने बंद केल्या, तर पाणीटंचाईवर थोडीफार मात करता येईल, हे उघड सत्य आहे; पण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली पाहिजे, अशी भावना काही नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. या गळतीमुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरत असून, याचा त्यांना त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ही गळती ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.