शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

गडमुडशिंगीत गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 18, 2015 00:12 IST

जीवन प्राधिकरणचे दुर्लक्ष : जिल्हा परिषद सदस्यांची सूचनाही हवेतच, पाणीटंचाईमुळे नागरिकांतून मात्र संताप

गांधीनगर : महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट आहे. पाण्याची कमतरता असली, तरी काही तांत्रिक बाबींमुळेही पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गडमुडशिंगी (ता. करवीर)सह सात गावांतही हीच परिस्थिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तरीही प्रशासन गांधारीची भूमिका घेत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असून, त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.गडमुडशिंगी, गांधीनगर, वसगडे, वळिवडे, चिंचवाड, न्यू वाडदे या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन आहे. गडमुडशिंगी ते वसगडे या मुख्य रस्त्यावर महाराष्ट्र बँकेजवळच पाईप फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत कळवूनही अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी यांनीही ‘एमजीपी’च्या अधिकाऱ्यांना गळतीबाबत सांगितले; पण कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. स्थानिकांनी याबाबतची कल्पना देऊनही प्रशासकीय अधिकारी जबाबदारीने येऊन गळती काढण्यासाठी पुढे सरसावत नाहीत. त्यामुळे काही गावांना ऐन उन्हाळ््यात पाण्याची उपलब्धता असूनही पाणीटंचाईची झळ बसत आहे. अशा अनेक गळत्या जिल्ह्यातील काही योजनांना लागल्या आहेत. त्या जरी प्रशासनाने गांभीर्याने बंद केल्या, तर पाणीटंचाईवर थोडीफार मात करता येईल, हे उघड सत्य आहे; पण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली पाहिजे, अशी भावना काही नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. या गळतीमुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरत असून, याचा त्यांना त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ही गळती ताबडतोब काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.