शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रेल्वेगाड्यांअभावी वारकऱ्यांचे हाल

By admin | Updated: October 31, 2014 23:51 IST

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना

मिरज : कार्तिक वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना यावर्षी पंढरपूरसाठी जादा रेल्वे सोडण्यात आलेली नाही. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने मिरजेतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सकाळी व सायंकाळी तीनच रेल्वेगाड्या आहेत. आषाढी कार्तिकी वारीसाह दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मिरजेतून पंढरपूरला जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी सहा वाजता रात्री साडेआठ वाजता अशा तीनच रेल्वेगाड्या आहेत. सोमवार व शुक्रवारी दुपारी कोल्हापूर गोंदिया एक्स्प्रेस आहे. दररोज सकाळी सहापासून सायंकाळी सहापर्यंत बारा तासात पंढरपूरला जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी नाही. आषाढी-कार्तिक वारीला कर्नाटक व कोकणातून येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येतात. मात्र यावर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने जादा रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रद्द केल्याने वारकऱ्यांची अडचण झाली आहे. सायंकाळी व रात्री सुटणाऱ्या पॅसेंजरला वारकऱ्यांची खचाखच गर्दी आहे. रेल्वेत पाय ठेवायला जागा नसल्याने वृध्द, महिला व बालकांचे हाल सुरू आहेत. जादा रेल्वेपासून मोठे उत्पन्न मिळत असतानाही रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याच्या कारणावरून पंढरपूरसाठी जादा रेल्वे न सोडण्याचा अव्यवहार्य निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)