शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

प्रभाग रचनाही संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: August 5, 2015 00:02 IST

महानगरपालिका निवडणूक : इच्छुक उमेदवार, नगरसेवकांच्या तक्रारी

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण निश्चित करताना अधिकाऱ्यांनी गंभीर चूक केल्याची बाब समोर येताच शहरात नव्याने तयार केलेले ८१ प्रभागही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. भौगोलिक सलगता, प्रगणक यासंबंधीचे नियम डावलून प्रभाग तयार केल्याची सार्वत्रिक तक्रार केली जात आहे. आरक्षण सोडतीला हरकत घेण्यात येणार आहे, तशीच आता उच्च न्यायालयात जाऊन प्रभाग रचनेलाही हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे.आरक्षणाबाबतची चूक लक्षात आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे फर्मान काढले. त्यातच आता प्रभाग रचनेवरही आक्षेप घेतले जात आहेत. नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांनी प्रभाग रचनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उघडपणे हरकती घेतल्या जात आहेत. ही प्रक्रिया सदोष असल्याचा आरोप होत आहे.(प्रतिनिधी)रोजंदारी कर्मचाऱ्यांनी केले नकाशे शहराची सॅटेलाईट प्रतिमा घेऊन त्याद्वारे प्रभाग करण्याचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येते; परंतु ज्यांना शहराचा अभ्यास नाही, गल्लीबोळ, रस्ते माहीत नाहीत, अशा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांकडून प्रभाग नकाशे तयार करून घेण्यात आले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यासाठी वापर करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग तसेच नगररचना विभागाकडील अभियंते, सर्व्हेअर किंवा जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एकूण प्रक्रियेवरच आक्षेप नोंदविले जात आहेत. न्यायालयात जाण्याची तयारी प्रभाग रचनेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी व कॉँग्रेसतर्फे या तक्रारी निवडणूक आयोगाकडे कराव्यात, असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे अशा तक्रारी एकत्र करण्यात येत आहेत. सर्व तक्रारी घेऊन त्यावर आधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याचा मनोदय शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी मंगळवारी व्यक्त के ला. एकाच गल्लीतील घरेवेगवेगळ्या प्रभागांतसदर बाजार, विचारे माळ, कदमवाडी, जाधववाडी, राजाराम चौक, गंजी माळ या भागांत अशा घटना घडल्या आहेत. एकाच गल्लीतील समोरासमोर असलेली घरे वेगवेगळ्या प्रभागांत गेली आहेत. काही प्रभागांचा परिसर चालून पूर्ण करायचा म्हटला तर दोन-दोन दिवसही पुरणार नाहीत. विक्रमनगर प्रभाग हा चक्क शिवाजी विद्यापीठसमोरच्या कृषी महाविद्यालयापर्यंत जोडला आहे. प्रगणक गट फोडलेच प्रभाग रचना तयार करताना शक्यतो प्रगणक गट फोडले जाणार नाहीत, असे आधी महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले होते. जातनिहाय जनगणनेसाठी हे पाचशे लोकसंख्या असलेले प्रगणक गट तयार करण्यात आले होते. हे अखंड गट प्रभागात जोडले जाणार होते. मात्र, नंतर हे गटही तोडले; त्यामुळे मूळ संकल्पनेला धक्का पोहोचला आहे.