शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग कानोसा - प्रभाग क्रमांक ५४ - चंद्रेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

विद्यमान नगरसेविका - शोभा बोंद्रे ‘चंद्रेश्वर’ प्रभागात दोन भावांत लढत : बोंद्रे-खराडे आमनेसामने : तडजोडीचे प्रयत्न असफल भारत चव्हाण ...

विद्यमान नगरसेविका - शोभा बोंद्रे

‘चंद्रेश्वर’ प्रभागात दोन भावांत लढत : बोंद्रे-खराडे आमनेसामने : तडजोडीचे प्रयत्न असफल

भारत चव्हाण / लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक किती मोठ्या चुरशीची आणि राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे याची प्रचीती शिवाजी पेठेतील ‘प्रभाग क्रमांक ५४- चंद्रेश्वर’ येथे आली. प्रभागांतून बोंद्रे -खराडे या नावाजलेल्या घराण्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. दोन्ही घराण्यांत कोणी निवडणूक लढवावी यावर विचारमंथन झाले, पर्याय दिले गेले; पण एकमत न झाल्यामुळे अखेर माजी नगरसेवक इंद्रजित पंडितराव बोंद्रे व शिवतेज इंद्रनील ऊर्फ अजित खराडे या दोन बंधूंत लढत होऊ घातली आहे. शिवतेज हे इंद्रजित यांचे आत्येभाऊ आहेत.

शिवाजी पेठेत बोंद्रे आणि खराडे ही राजकीय घराणी सुपरिचित आहेत. आतापर्यंत महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही घराण्यांतील सदस्य एकमेकांविरुद्ध कधी लढले नाहीत. त्याला कारण म्हणजे कै. महिपतराव बोंद्रे होय. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम असायचा. त्यांच्या शब्दाला मान देऊनच या घराण्यांनी तडजोडी केल्या. त्यामुळे सई खराडे, इंद्रजित बोंद्रे, शोभा बोंद्रे नगरसेवक झाले. नंतरच्या काळात सई खराडे व शोभा बोंद्रे महापौर झाल्या. त्याला महत्त्वाचे कारण दोन घराण्यांतील एकी होती. मोठ्यांच्या शब्दाला मान व एकमेकांवरील विश्वास होता.

परंतु होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत या घराण्यांत गडबड झाली. महिपतराव बोंद्रे, सखारामबापू खराडे आज हयात नाहीत. त्यामुळे कोणी कोणाचे ऐकावे आणि कोणी कोणासाठी थांबावे असा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येकाला नगरसेवक व्हावे असे वाटत आहे. त्यामुळे तडजोडी अयशस्वी झाल्यामुळे शिवतेज खराडे व इंद्रजित बोंद्रे यांनी एकमेकांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.

मी ‘चंद्रेश्वर’मधून, तर शिवतेज किंवा त्यांच्या पत्नीने प्रभाग क्रमांक ७३, ८० किंवा ८१ येथून निवडणूक लढवावी, अशी चर्चा आरक्षण पडण्यापूर्वी आमच्यात झाली होती. आरक्षणे जाहीर झाल्यानंतरच्या चर्चेत, मी चंद्रेश्वरमधून लढतोय, शिवतेजच्या पत्नीला प्रभाग क्रमांक ८१ मधून उभे करा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो असा शब्द दिला; पण त्यांनी तो अमान्य केला, असा दावा इंद्रजित यांनी केला आहे.

तर शिवतेज यांच्या दाव्यानुसार २०१५ ला सई खराडे निवडणूक लढणार होत्या; परंतु महिपतराव बोंद्रे यांच्या शब्दाखातर आम्ही माघार घेऊन शोभा बोंद्रे यांना पाठिंबा दिला. त्यावेळी बोंद्रे यांनीच पुढील निवडणुकीत शिवतेजला संधी द्यायची असे स्पष्ट केले होते. मग त्यांचा शब्द पाळायची जबाबदारी आता इंद्रजित यांच्यावर होती. त्यांनी ती पाळण्यास नकार दिला. मग प्रत्येक वेळी आम्हीच का थांबायचे, असा सवाल शिवतेज यांचा आहे.

इंद्रजित व शिवतेज यांच्यातील चर्चा निष्फल व अयशस्वी ठरल्यामुळे प्रभागाचे वातावरण आता या दोघांभोवतीच फिरणार आहे. कोणता भाऊ निवडणूक जिंकणार आणि कोणता भाऊ हरणार हाच चर्चेचा विषय आहे. तसे बघितले तर बोंद्रे व खराडे घराण्यास समाजसेवेची, महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्याची माहिती आहे. सई खराडे यांनी अडीच वर्षे, तर शोभा बोंद्रे यांनी सहा महिने महापौरपद भूषविले आहे. त्यामुळे दोघांनाही प्रशासनाकडून कामे कशी करून घ्यायची याची कलाही अवगत आहे.

इंद्रजित यांची उमेदवारी काँग्रेसकडून निश्चित मानली जाते, तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवतेज खराडेंना उमेदवारी देण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. या दोघांसह शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश सरनाईक निवडणूक लढविणार आहेत; परंतु ते यावेळी शिवसेनेऐवजी भाजपचे कमळ हातात घेणार असल्याचे सांगण्यात येते. या तीन उमेदवारांव्यतिरिक्त प्रभागात अन्य कोणत्या उमेदवाराची चर्चा दिसत नाही. काही जण आपली उमेदवारी निवडणूक जाहीर झाल्यावर ठरविणार आहेत.

- प्रभागात सोडविलेले नागरी प्रश्न -

रंकाळा तलाव ते महालक्ष्मी मार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले. रंकाळा तलावावर कमान उभारली. संध्यामठ सांस्कृतिक हॉलचे नूतनीकरण, प्रभागातील चाळीस वर्षांपूर्वीच्या ड्रेनेजलाइन व जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. ऐंशी टक्के प्रभागांत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. गल्लीबोळांत काँक्रीट पॅसेज करण्यात आले आहेत.

-प्रभागातील शिल्लक नागरी प्रश्न-

प्रभागातील वीस टक्के भागांतील डांबरीकरण झालेले नाही. मोहिते बोळात चॅनल बांधण्याचे राहिले आहे. गिरणगल्लीत गटार लाइन बांधलेली नाही.

नगरसेविकेचा कोट -

गेल्या पाच वर्षांत प्रभागातील सर्व कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तरीही सर्वच कामे झाली असा माझा दावा नाही. काही कामे मंजूर आहेत, ती आता सुरू होतील. संध्यामठ हॉलची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम केल्यामुळे अनेक नागरिकांची साेय झाली आहे.

- गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते -

- शोभा बोंद्रे (काँग्रेस) - २०२५

- प्रियंका इंगवले (ताराराणी आघाडी) ४५४

- सुनीता पन्हाळकर (राष्ट्रवादी) ९०८

- रजनी सरनाईक ( ४८९)