शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

‘संग्राम कक्षा’चा गाशा गुंडाळला

By admin | Updated: December 31, 2015 23:54 IST

शासनाकडून मुदतवाढ नाही : राज्यातील २० हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -शासनाकडून मुदतवाढ न मिळाल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायतीतील ‘संग्राम कक्षा’चा आज, शुक्रवारी म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे राज्यातील २० हजार संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आॅनलाईन कामकाजही बंद झाले आहे. ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. कक्षातील कामकाजाचा गुरुवारी शेवटचा दिवस ठरला. शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागातर्फे ३० एप्रिल २०११ रोजी निर्णय घेऊन राज्यात ‘संग्राम कक्ष’ सुरू करण्यात आले. पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण व बळकटीकरण करणे, कारभारात सुसूत्रता, पारदर्शकता आणणे या प्रमुख उद्देशासाठी कक्ष सुरू केले. कक्ष चालविण्याची जबाबदारी महाआॅनलाईन कंपनीला देण्यात आली. कंपनीने एक हजार लोकसंख्येवरील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील कक्षात संगणक परिचालकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर केली. जिल्हा परिषदेच्या कक्षातील जिल्हा समन्वयकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. कक्षामुळे ‘ई-ग्रामपंचायती’ झाल्या.महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास, पंचायत राज संस्थांच्या अभिलेखांचे स्कॅनिंग, डिजीटलायझेशन करणे, ग्रामस्थांना आॅनलाईन दाखले देणे, संगणक साक्षरता वाढविणे, कारभार आॅनलाईन करणे, पंचायत राज संस्थांचा कोष तयार करणे, ई-आॅफिसची अंमलबजावणी करणे आदी कामे कक्षातून केली जात होती. त्यासाठी ‘संग्राम’मधील परिचालकांना चार ते सात हजार रुपयांपर्यंत कंपनीतर्फे पगार दिला जात होता. राज्यातील सर्व ‘संग्राम’मध्ये २० हजार परिचालक कार्यरत होते. ‘संग्राम’धील आॅनलाईन कामकाजात राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला राहिला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांना वेळेत दाखले मिळत होते. त्यामुळे चांगली सोय झाली होती. दरम्यान, संग्राम कक्षातील सर्व परिचालक एकत्र येऊन संघटना स्थापन केली. राज्य संग्राम संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली नोकरीत कायम करावे, पगारात वाढ करावी यासाठी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आंदोलन छेडले. हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. इतका पाठपुरावा करूनही संघटनेला आश्वासनाशिवाय फारसे काही मिळाले नाही. दोन ते तीन महिन्यांच्या परिचालकांचा पगारही मिळालेला नाही. परिणामी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.गुरुवार कामकाजाचा शेवटचा दिवसआंदोलनाच्या माध्यमातून शासनाशी संघर्ष केला. तरीही शासनाने परिचालकांच्या मागण्याही मान्य झाल्या नाहीत आणि मुदतवाढही दिली नाही. परिणामी ३१ डिसेंबर ‘संग्राम’मधील संगणक परिचालकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला. संग्राम कक्षाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, अद्याप मुदतवाढीचा आदेश शासनाकडून आलेला नाही. आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.- अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), कोल्हापूर.