शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘संग्राम कक्षा’चा गाशा गुंडाळला

By admin | Updated: December 31, 2015 23:54 IST

शासनाकडून मुदतवाढ नाही : राज्यातील २० हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -शासनाकडून मुदतवाढ न मिळाल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायतीतील ‘संग्राम कक्षा’चा आज, शुक्रवारी म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे राज्यातील २० हजार संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आॅनलाईन कामकाजही बंद झाले आहे. ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. कक्षातील कामकाजाचा गुरुवारी शेवटचा दिवस ठरला. शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागातर्फे ३० एप्रिल २०११ रोजी निर्णय घेऊन राज्यात ‘संग्राम कक्ष’ सुरू करण्यात आले. पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण व बळकटीकरण करणे, कारभारात सुसूत्रता, पारदर्शकता आणणे या प्रमुख उद्देशासाठी कक्ष सुरू केले. कक्ष चालविण्याची जबाबदारी महाआॅनलाईन कंपनीला देण्यात आली. कंपनीने एक हजार लोकसंख्येवरील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील कक्षात संगणक परिचालकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर केली. जिल्हा परिषदेच्या कक्षातील जिल्हा समन्वयकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. कक्षामुळे ‘ई-ग्रामपंचायती’ झाल्या.महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास, पंचायत राज संस्थांच्या अभिलेखांचे स्कॅनिंग, डिजीटलायझेशन करणे, ग्रामस्थांना आॅनलाईन दाखले देणे, संगणक साक्षरता वाढविणे, कारभार आॅनलाईन करणे, पंचायत राज संस्थांचा कोष तयार करणे, ई-आॅफिसची अंमलबजावणी करणे आदी कामे कक्षातून केली जात होती. त्यासाठी ‘संग्राम’मधील परिचालकांना चार ते सात हजार रुपयांपर्यंत कंपनीतर्फे पगार दिला जात होता. राज्यातील सर्व ‘संग्राम’मध्ये २० हजार परिचालक कार्यरत होते. ‘संग्राम’धील आॅनलाईन कामकाजात राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला राहिला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांना वेळेत दाखले मिळत होते. त्यामुळे चांगली सोय झाली होती. दरम्यान, संग्राम कक्षातील सर्व परिचालक एकत्र येऊन संघटना स्थापन केली. राज्य संग्राम संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली नोकरीत कायम करावे, पगारात वाढ करावी यासाठी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आंदोलन छेडले. हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. इतका पाठपुरावा करूनही संघटनेला आश्वासनाशिवाय फारसे काही मिळाले नाही. दोन ते तीन महिन्यांच्या परिचालकांचा पगारही मिळालेला नाही. परिणामी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.गुरुवार कामकाजाचा शेवटचा दिवसआंदोलनाच्या माध्यमातून शासनाशी संघर्ष केला. तरीही शासनाने परिचालकांच्या मागण्याही मान्य झाल्या नाहीत आणि मुदतवाढही दिली नाही. परिणामी ३१ डिसेंबर ‘संग्राम’मधील संगणक परिचालकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला. संग्राम कक्षाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, अद्याप मुदतवाढीचा आदेश शासनाकडून आलेला नाही. आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.- अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), कोल्हापूर.