शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘संग्राम कक्षा’चा गाशा गुंडाळला

By admin | Updated: December 31, 2015 23:54 IST

शासनाकडून मुदतवाढ नाही : राज्यातील २० हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -शासनाकडून मुदतवाढ न मिळाल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायतीतील ‘संग्राम कक्षा’चा आज, शुक्रवारी म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे राज्यातील २० हजार संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आॅनलाईन कामकाजही बंद झाले आहे. ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. कक्षातील कामकाजाचा गुरुवारी शेवटचा दिवस ठरला. शासनाच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागातर्फे ३० एप्रिल २०११ रोजी निर्णय घेऊन राज्यात ‘संग्राम कक्ष’ सुरू करण्यात आले. पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण व बळकटीकरण करणे, कारभारात सुसूत्रता, पारदर्शकता आणणे या प्रमुख उद्देशासाठी कक्ष सुरू केले. कक्ष चालविण्याची जबाबदारी महाआॅनलाईन कंपनीला देण्यात आली. कंपनीने एक हजार लोकसंख्येवरील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील कक्षात संगणक परिचालकांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर केली. जिल्हा परिषदेच्या कक्षातील जिल्हा समन्वयकाच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. कक्षामुळे ‘ई-ग्रामपंचायती’ झाल्या.महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास, पंचायत राज संस्थांच्या अभिलेखांचे स्कॅनिंग, डिजीटलायझेशन करणे, ग्रामस्थांना आॅनलाईन दाखले देणे, संगणक साक्षरता वाढविणे, कारभार आॅनलाईन करणे, पंचायत राज संस्थांचा कोष तयार करणे, ई-आॅफिसची अंमलबजावणी करणे आदी कामे कक्षातून केली जात होती. त्यासाठी ‘संग्राम’मधील परिचालकांना चार ते सात हजार रुपयांपर्यंत कंपनीतर्फे पगार दिला जात होता. राज्यातील सर्व ‘संग्राम’मध्ये २० हजार परिचालक कार्यरत होते. ‘संग्राम’धील आॅनलाईन कामकाजात राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला राहिला. अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांना वेळेत दाखले मिळत होते. त्यामुळे चांगली सोय झाली होती. दरम्यान, संग्राम कक्षातील सर्व परिचालक एकत्र येऊन संघटना स्थापन केली. राज्य संग्राम संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली नोकरीत कायम करावे, पगारात वाढ करावी यासाठी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आंदोलन छेडले. हिवाळी अधिवेशनावरही मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. इतका पाठपुरावा करूनही संघटनेला आश्वासनाशिवाय फारसे काही मिळाले नाही. दोन ते तीन महिन्यांच्या परिचालकांचा पगारही मिळालेला नाही. परिणामी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.गुरुवार कामकाजाचा शेवटचा दिवसआंदोलनाच्या माध्यमातून शासनाशी संघर्ष केला. तरीही शासनाने परिचालकांच्या मागण्याही मान्य झाल्या नाहीत आणि मुदतवाढही दिली नाही. परिणामी ३१ डिसेंबर ‘संग्राम’मधील संगणक परिचालकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला. संग्राम कक्षाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, अद्याप मुदतवाढीचा आदेश शासनाकडून आलेला नाही. आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.- अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), कोल्हापूर.