शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निरोगी जोडीदार आणि एकत्र कुटुंब हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:53 IST

कोल्हापूर : कोरोनानंतर उपवर वधू-वरांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. मुलगा आयटीतलाच हवा, मुलगी गोरीपानच हवी, सुंदर असावी, कमावणारी ...

कोल्हापूर : कोरोनानंतर उपवर वधू-वरांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला आहे. मुलगा आयटीतलाच हवा, मुलगी गोरीपानच हवी, सुंदर असावी, कमावणारी असावी, मुलाला लाखाचे पॅकेज हवे, सासू-सासऱ्यांचा त्रास नको, एकत्र कुटुंब नको, अशा अटी-शर्तींवर लग्न करण्याची मानसिकता आता राहिली नाही. एकत्र कुटुंब पद्धती, पैशांपेक्षा निरोगी आयुष्य याचे महत्त्व पटल्याने आता अपेक्षांमध्येही बदल झाला आहे.

दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या कोरोनाने माणसाच्या जगण्याच्या संकल्पनाच बदलल्या. गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. कोरोनाचा शिरकाव झालेल्या कुटुंबांना एकटेपणात जगावे लागले. एखाद्याचा मृत्यू झाला तर खांदा द्यायलाही कोणी नसते, याची जाणीव झाली. निरोगी आणि आरोग्यदायी जीवनाचे महत्त्व नव्याने कळले. या महामारीने पैशांपेक्षा नातेसंबंधांचे महत्त्व आणि गरजही कळले. सगळ्याच क्षेत्रावर या आजाराचे जसे चांगले वाईट परिणाम झाले तसेच परिणाम उपवर वधू-वरांच्या अपेक्षांवरही झाले.

एरवी मला अमूक पगारात, विशिष्ट शहरात राहणारा, आई-वडील जवळ राहत नसलेला नवरा हवा अशी अपेक्षा असलेल्या मुलींना आता निरोगी-कोणतेही आजार नसलेला, आरोग्यदायी जीवनशैली असलेला, जरा कमी पगाराचा आणि शक्यतो आपल्याच शहरात किंवा फार तर शेजारच्या जिल्ह्यात राहणारा नवरा हवा आहे. संकटकाळात नोकरी-व्यवसायात अडचणी आल्या तर सारवणारी माणसं असावीत म्हणून एकत्र कुटुंबही चालेल, असे मुलींचे व पालकांचेही म्हणणे आहे.

मुलांनाही मुलगी देखणी, गोरीपान, उच्चशिक्षित हवी, नोकरी करणारी हवा अशा वेगवेगळ्या अपेक्षा होत्या, आता त्यांनाही मुरड घालत कुटुंब व्यवस्था सांभाळणारी, एकत्र कुटुंबात राहणारी आणि जरा कमी शिकलेली किंवा कमी पगाराची नोकरी असलेली मुलगीही चालेल, अशी अपेक्षा आहे.

--

या अपेक्षांची पडली भर

-निरोगी, आरोग्यदाजी जीवनशैली

-ऑनलाईन क्षेत्रातील नोकरी

-आपल्याच शहरातील किंवा कमी अंतर असलेल्या जिल्ह्यातील स्थळ

-कमी पगार असला तरी चालेल, पण चांगला स्वभाव

-आई-वडील, एकत्र कुटुंब असले तरी चालेल

-मुलगीही कमावती हवी.

----

या अपेक्षा झाल्या कमी

- लग्न धुमधडाक्यात व्हावे

-अमूक शहरातच राहणारा मुलगा-मुलगी हवी

-गलेलठ्ठ पगार

-शाश्वत नोकरी किंवा व्यवसाय

-मुलगा एकुलता एक हवा

-आई-वडील जवळ नको

----

कोरोना, लॉकडाऊनने निरोगी आयुष्य, एकत्र कुटुंब आणि पैशांपेक्षा नात्यांना आणि सुखी जीवनाला अधिक महत्त्व असल्याची जाणीव झाली आहे. त्याचा परिणाम वधू-वरांच्या अपेक्षांवरही झाला आहे. डामडौल, दिखावा न करता कमी पैशात लग्न होतात हे कळलं. म्हणूनच या काळात विवाहांचे प्रमाणही वाढले.

-श्रीकांत लिमये, पंचरत्न वधू-वर सूचक केंद्र

---