शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

मृतांच्या नातेवाईकांना पोलिसांची प्रतीक्षा!

By admin | Updated: January 3, 2015 00:11 IST

‘सिव्हिल’मधील प्रकार : नियम बदलला; नातेवाईकांचे हाल

सचिन लाड :सांगली :येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेहाचा पंचनामा आणि विच्छेदन तपासणी करून घेण्यासाठी नातेवाईकांना पोलीसदादांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पोलीसदादाला संबंधित तालुक्यातून येण्यास चार-चार तास लागत असल्याने मृतदेह ताटकळत ठेवावे लागत आहेत. पूर्वी रुग्णालयातील पोलीस सर्व प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात देत. मात्र आता नियम बदलल्याने त्याचा फटका मृतांच्या नातेवाईकांना बसत आहे.‘सिव्हिल’मध्ये महापालिका क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर वैद्यकीय अधिकारी संबंधित पोलीस ठाण्यांना याची माहिती देतात. त्यानंतर पोलीस येऊन पंचनामा करतात. शवविच्छेदन तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र नातेवाईकांना देतात. ही सर्व प्रक्रिया दोन-तीन तासात उरकली जाते. शहराबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला, तर मृतदेहाचा पंचनामा, शवविच्छेदन तपासणी, प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ‘सिव्हिल’मधील पोलिसांकडेच होती. नातेवाईकांचा जबाबही तेच नोंदवून घेत. आता मात्र ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरण आहे, त्या पोलिसांनी समक्ष येऊन जखमीचा जबाब व मृताचा पंचनामा करण्याचा नवीन नियम सुरू केला आहे. याशिवाय विविध प्रकारच्या दाखल झालेल्या रुग्णांची माहिती वैद्यकीय अधिकारी पोलीस ठाण्यांना कळवित असत. मात्र ही जबाबदारी आता रुग्णालयातील पोलिसांवर सोपविण्यात आली आहे.मृत्यूचे प्रकरण त्या-त्या पोलीस ठाण्यांनी हाताळले पाहिजे, हा नियम योग्य असला तरी जत, आटपाडी, खानापूर, शिराळा या तालुक्यांतील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते येथे येण्यास किमान तीन-चार तास लागतात. तोपर्यंत मृताच्या नातेवाईकांना पोलीसदादाची प्रतीक्षा करीत बसावे लागत आहे. सकाळी मृत झालेल्या व्यक्तीचा पंचनामा व विच्छेदन तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना मिळण्यासाठी सायंकाळी सात वाजतात. तोपर्यंत मृतदेह ताटकळत ठेवावा लागत आहे.ग्रामीण पोलिसांना झळ लागलीतालुक्यातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या तपासणीची सर्व कागदपत्रे रुग्णालयातच असत. ती नेण्यासाठीही पोलीस टाळाटाळ करत. जखमीची माहिती कळविली तरी, ते जबाब घेण्यासाठी वेळेत येत नसत. ही सर्व कामे रुग्णालयातील पोलिसांना करावी लागत होती. सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटकातील अनेक प्रकरणे रुग्णालयातील पोलिसांच्या गळ्यात पडत होती. तीन जिल्हे व कर्नाटकातील मृत्यूची प्रकरणे, तसेच न्यायालयात साक्ष देण्यासाठी जाणे आदी कामे दोन पोलीस हाताळत होते.