शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:30 IST

संदीप बावचे : शिरोळ : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आलेला आहे. असा प्रत्येक ...

संदीप बावचे :

शिरोळ : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेला महापूर अनेक प्रश्न व आव्हाने घेऊन आलेला आहे. असा प्रत्येक वर्षाला महापूर येणार असेल, तर आम्ही शेती पिकवायची की नाही, असा प्रश्न शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. यंदा महापुरामुळे वीस हजार हेक्टर क्षेत्रातील तीस कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापुरामुळे तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक पध्दतीत बदल करण्याची मानसिकता निर्माण झाली आहे.

२०१९ च्या महापुरानंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा या नद्यांच्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात हाहाकार माजला. बघता-बघता ऊस, सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला, फूलशेती, केळी यासह अन्य पिके पाण्याखाली गेली. तीन दिवसांच्या अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारा शेतकरी महापुरामुळे खचला आहे. उभी पिके पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. पूर ओसरल्यानंतर पिकांचा पालापाचोळा दिसत आहे. कुजलेली पिके शेतातून बाहेर काढली जात आहेत. शेतीचे भकास चित्र दिसू लागले आहे. कुजलेल्या पिकांची विल्हेवाट लावणे हे एक आव्हानच ठरत आहे. ज्या जमिनीवर सतत आठ-दहा दिवस पाणी साचून राहिले, त्या जमिनीतील जिवाणू मरून गेले आहेत. त्याचे पुन्हा संवर्धन करणे शिवाय पीकवाढीवर होणारे परिणाम देखील शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहेत. पिकामध्ये केलेली गुंतवणूक वाया गेली आहे. शेतकरी पुन्हा उभा राहण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी संघर्ष समित्यांचा एल्गार सुरू आहे. पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी अनेक आश्वासने सरकारने दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा लागून राहिली आहे.

फोटो - १३०८२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ -

शिरोळ-शिरटी मार्गावरील महापुराने खराब झालेले सोयाबीन पीक शेतकरी कापून टाकत आहेत. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)