शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वारणा उजव्या कालव्यास निधीची प्रतीक्षा

By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST

तीस वर्षांपासून काम बंद : शेतकऱ्यांचे नुकसान, सरकार लक्ष देणार का ?

रामचंद्र पाटील - बांबवडे -वारणा उजवा कालव्याच्या तीस वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असून, थांबलेल्या उर्वरित कामास नवीन सरकार गती देणार का, असा प्रश्न ग्रामस्थांतून होत आहे.चांदोली धरणापासून हा कालवा शाहूवाडी तालुक्यातील चरण-डोणोली येथून सातवे, सावर्डे, वारणानगर मार्गे सांगली जिल्ह्यात जातो. साधारणपणे १९७७/७८ च्या दरम्यान या कालव्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर चांदोलीपासून शाहूवाडी तालुक्यातील शिंपेपर्यंत या कालव्याचे काम पूर्णत्वास आले आहे. वारणानगरपर्यंत कामाचा विचार केल्यास ८० टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे.साधारणपणे ६० किलोमीटरचे काम पूर्ण होत आले आहे. केंद्र सरकारच्या निधीतूनच अशी मोठी कामे पूर्ण होत असतात. सत्तरच्या दशकात हे काम सुरू झाले. रडतखडत हे काम आठ-दहा वर्षे सुरू होते. त्यानंतर २००६ पर्यंत हे काम बंद होते आणि पूर्वी झालेल्या भूसंपादनावरच हे काम पुन्हा सुरू झाले. भूसंपादन झालेल्या जमीनधारकांना त्यावेळच्या दराने नाममात्र मोबदला मिळाला. डोणोली गावातील जमीन वगळता सर्व ठिकाणच्या जमिनींचे भूसंपादन झाले होते. भूसंपादन न झालेल्या जमिनीतूनही कालव्याचे काम सुरू झाले. या जमिनीच्या ठिकाणी आता अर्धवट स्थितीतील सेतूचे खांब उभे आहेत. या जमिनीचा मोबदला अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि शेतामध्ये पिकेसुद्धा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.२००६ ला ज्यावेळी पुन्हा काम सुरू झाले, त्यावेळी आता हा कालवा पूर्णत्वाकडे जाईल, अशी आशा लोकांना लागून राहिली होती; परंतु या कालव्याचे पाणी ज्या भागातून जाते त्या भागातील लोकांना पाण्याचा वापर शेतीसाठी मिळणार की नाही, याचाही संभ्रम लोकांच्या मनात आहे. हा कालवा कृष्णा खोरेच्या माध्यमातून तयार होत असून, दुष्काळी भागात हे पाणी नेले जात आहे.दुष्काळ निवारणासाठी शासन वर्षाला करोडो रुपये खर्च करते; परंतु करोडो रुपये अर्धवट कालव्याच्या कामात अडकलेले आहेत, याचा विचार होणे गरजेचे आहे. नव्याने काम सुरू झाले त्यावेळी शासनाने यासाठी निधी मंजूर केला. ठेकेदारांनी एक किलोमीटर-दोन किलोमीटर अंतराचे काम हाती घेतले. सुरुवातीची दोन वर्षे हे काम गतीने सुरू होते. शासनाने नंतर निधीसाठी हात आखडता घेतला. ठेकेदारांनी पदरमोड करून कामेसुरू ठेवली होती. गुंतवलेला पैसा निघण्याची आशा धूसर होऊ लागली, तसा त्यांनीही हात आखडता घेतला.फडणवीस सरकारने याकडे लक्ष देत निधी मंजूर करावा. जेणेकरून रखडलेली कामे पूण होतील, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.