शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल ग्राम’ पंचायतींना धनादेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 26, 2014 00:00 IST

गांधीनगर, उजळाईवाडी : पुरस्कार प्रदान होऊन झाली तब्बल दोन वर्षे

रमेश पाटील -कसबा बावडा -करवीर तालुक्यातील गांधीनगर आणि उजळाईवाडी या दोन ग्रामपंचायतींना दोन वर्षांनंतरही ‘निर्मलग्राम’ बक्षिसाच्या रकमेचा धनादेश मिळालेला नाही. औरंगाबाद येथे शासनाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका शानदार कार्यक्रमात या दोन ग्रामपंचायतींना केवळ प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले होते. रोख रकमेचा धनादेश नंतर देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. बक्षिसाची रक्कम मिळावी म्हणून या दोन ग्रामपंचायतींनी करवीर पंचायत व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही.प्रत्येक गाव, तालुका निर्मलग्राम व्हावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी काही अनुदान व बक्षिसे जाहीर करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून पुढे निरोगी, समृद्ध आणि सुखी जीवनासाठी मंत्र म्हणून प्रत्येक घरात शौचालये झाली. परिसर, शाळा, घराची अंगणे स्वच्छ होऊ लागली. पात्र ठरलेल्या गावांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. प्रशस्तिपत्र, शिल्ड व रोख रक्कम मिळाली. मात्र, याला तालुक्यातील गांधीनगर आणि उजळाईवाडी ही दोन गावे मात्र बक्षिसाच्या रकमेपासून वंचित राहिली आहेत.बक्षिसाची रक्कम किती आहे, यापेक्षा ती मिळाली किंवा आपली ग्रामपंचायत बक्षिसास पात्र ठरली, याचाच अभिमान ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना जास्त असतो. गांधीनगर आणि उजळाईवाडी या ग्रामपंचायतीची बक्षिसाची रक्कम प्रत्येकी चार लाखांच्या पुढे आहे. मात्र, त्यांना ती मिळालेली नाही याचे त्यांना वाईट वाटते. जिल्हा परिषदेकडे याबाबत पत्रव्यवहार व चौकशी केल्यानंतर निधी नाही. निधी उपलब्ध झाल्यावर बक्षिसाची रक्कम दिली जाईल, असे उत्तर दिले जात असल्याचे या दोन ग्रामपंचायतीच्या सदस्यांतून बोलले जात आहे.गांधीनगर ग्रामपंचायत, निर्मलग्राम झाल्यावर सर्वांना आनंद झाला. औरंगाबाद येथील कार्यक्रमाला अनेक सदस्य व ग्रामस्थ गेले. तेथे केवळ सत्कार करून प्रशस्तिपत्र व शिल्ड देण्यात आले. बक्षिसाची रक्कम नंतर धनादेशाद्वारे दिली जाईल, असे स्पष्ट केले; परंतु अद्याप अशी रक्कम गांधीनगर ग्रामपंचायतीला मिळालेली नाही. बक्षिसाची रक्कम फार मोठी आहे असे नाही; परंतु ती अद्याप न मिळाल्याने काम करण्यातला उत्साह कमी होतो.- प्रतापराव चंदवाणी,गांधीनगर, ग्रामपंचायत सदस्य