शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

कागलमध्ये कॅटल शेडला निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:03 IST

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : कागल तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे गोठे दर्जेदार करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने ‘कॅटल शेड’ ही योजना राबविली आहे. यासाठी तालुक्यातील जवळपास ४८७ शेतकºयांना अर्थसाहाय्य मंजूर झाल्याच्या याद्याही संबंधित ग्रामपंचायतीकडे दिल्या आहेत. मात्र, या योजनेची कार्यवाहीच न केल्याने संबंधित लाभार्थी शेतकºयांना मनस्ताप सहन करावा ...

दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : कागल तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे गोठे दर्जेदार करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने ‘कॅटल शेड’ ही योजना राबविली आहे. यासाठी तालुक्यातील जवळपास ४८७ शेतकºयांना अर्थसाहाय्य मंजूर झाल्याच्या याद्याही संबंधित ग्रामपंचायतीकडे दिल्या आहेत. मात्र, या योजनेची कार्यवाहीच न केल्याने संबंधित लाभार्थी शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.योजनेची प्रक्रिया राबविण्यातच उन्हाळ्याचे चार महिने गेले. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात जनावरांना बांधायचे कोठे हा प्रश्न पडला आहे.‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ या उक्तीचा अनुभव शेतकºयांना येत असून, कॅटलशेडची अवस्था माकडाच्या घराच्या गोष्टीप्रमाणे झाली आहे.आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरीब शेतकºयांना जनावरांचा गोठा दर्जेदार बांधता येत नाही. परिणामी गोठ्यातील अव्यवस्थेमुळे दुभत्या जनावरांसह इतर जनावरांना विविध आजार उद्भवू शकतात. याबाबत शासन पातळीवर विचारविनिमय होऊन पात्र शेतकºयांना गोठ्यांमध्ये कोबा टाकणे, गोदण बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचे प्रस्तावित करण्यात आले.त्याप्रमाणे तालुक्यातील गावागावांतून पात्र पशुपालक शेतकºयांचे प्रस्ताव मागविण्यात आले. आलेल्या प्रस्तावांतून ५०० शेतकºयांना या योजनेत सहभागी करून घेतले. विशेष म्हणजे ही मंजूर यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडेही पाठविण्यात आली आहे. मात्र, अद्याप याबाबतकोणतीही कार्यवाही न झाल्याने संबंधित लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.अटींच्या पूर्ततेनंतरही दुर्लक्षचहे काम रोजगार हमी योजनेतून केले जाणार आहे. यासाठी आवश्यक तीन-चार कामगारांचे जॉब कार्ड, बँक खाती, रिकामी जागा, आदी सर्वच अटींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांनाही अद्याप वर्क आॅर्डर मिळालेली नाही.मिळणाºया अनुदानातून निधी जनावरांच्या पायात कोबा (मजबूत स्लॅब) तसेच, गोदण बांधण्याच्या अटीवर दिला जाणार आहे. त्यामुळे हा निधी मिळणार कधी आणि जनावरांना आसरा मिळणार कधी याबाबत उद्विग्नता व्यक्त होत आहे.अधिकारी कागदपत्रांच्या तिढ्यातच...एप्रिल महिन्यापासून रोहियोतील कामगारांना मजुरीवाढ करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे पूर्वीचे दरपत्रक बदलून नव्याने दरपत्रक तयार करणे, त्याचे नियोजन करणे यामध्येच अनेक दिवस प्रशासन गुरफटले आहे.तसेच, पात्र लाभार्थ्यांची यादी रोहियो विभागाकडून बांधकाम विभागाकडे पाठविली जाते, तर बांधकामचे अधिकारी त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून पुन्हा या विभागाकडे पाठवून त्याला वर्कआॅर्डर दिली जाते.मात्र, या संत प्रक्रियेमुळे आम्हाला नाहक त्रास होत असल्याचे लाभार्थ्यांतून बोलले जात आहे.