शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पन्हाळा तालुक्याला समतोल विकासाची प्रतीक्षा

By admin | Updated: November 14, 2014 00:39 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा : पन्हाळा पालिकेचा विकास आराखडा रखडला; पाच नद्या असूनही सिंचनाचा प्रश्न

देवदास वरेकर / पन्हाळाऐतिहासिक आणि पर्यटन महत्त्व असलेल्या पन्हाळ्याच्या समस्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या आहेत. पन्हाळा गिरीस्थानाचे आणि तालुक्यातील अनेक प्रश्न ‘जैसे थै’ आहेत. पन्हाळा नगरपालिकेचा विकास आराखडा गेल्या तीस वर्षांपासून शासन दरबारी रखडला आहे, तर तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या समस्या आहेत. नव्या नेतृत्त्वाने या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहेत. पन्हाळा तालुका पूर्व आणि पश्चिम असा विभागला आहे. तालुक्यात पूर्व भागात विकसित, तर पश्चिम अविकसित अशी तफावत दिसते. पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचा विकास आराखडा गेल्या तीस वर्षांपासून रखडला आहे.मार्च २०१३ मध्ये विकास आराखडा मंजूर होणे अपेक्षित असताना अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. वाढते पर्यटक आणि ऐतिहासिक महत्त्व पाहता पन्हाळगडाचा विकास होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आराखडा तयार करण्यात आला; पण त्याचे ना जाहीर प्रकटन झाले, ना नकाशे प्रसिद्ध झाले. तो विकास आराखडा नागरिकांसमोरदेखील आला नाही. आराखड्याची अशी परिस्थिती असताना याउलट विकासाच्या नावाखाली काही नागरिकांच्या घरातून रस्ते काढण्याचे प्रकार झाले आहेत. दीड वर्षापूर्वी आराखड्याबाबत हरकती मागविल्या असून, अद्याप त्यावर सुनावणी झालेली नाही, असे असताना पुन्हा नव्याने शासनाने नकाशाबाबत हरकती मागविल्या आहेत. तालुक्यातून पाच नद्या वाहत असतानादेखील नियोजनाअभावी सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीच्या पाण्यासाठी अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कोडोली-वारणा परिसर सिंचनाच्या दृष्टीने सुजलाम् सुफलाम् असला, तरी येथे रस्त्यांचा प्रश्न उग्र झाला आहे. येथील बहुतांश रस्ते खराब आणि अर्धवट अवस्थेत आहेत. बांदिवडे, घुंगरू, बेखंडवाडी, बादेवाडी, आदी परिसरातील वाड्या-वस्त्यांवर अजूनही एस.टी.ची सेवा पोहोचलेली नाही. कोलिक, पडसाळी, पिसात्री, काऊरवाडी, किसरूण, माणवाड, पाटपन्हाळा, आदी गावांच्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा उपद्रव सहन करावा लागतो.