शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

वडनेरे,गाडगीळ समितीच्या शिफारशींचा जरूर अंमल करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील शिफारशी अंमलात आणण्याचे धाडस नसते म्हणूनच ते बासनात गुंडाळून ठेवले जातात. मी असे घडू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. वडनेरे, गाडगीळ समितीपासून अन्य समित्यांचे आतापर्यंत जे अहवाल सादर झाले, त्यातील महत्त्वाच्या शिफारसी एकत्रित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, सगळ्या अहवालांचे एकत्रिकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे असतील ते एकत्रित करा. हे मुद्दे लोकांसमोर आले पाहिजेत. संकट आल्यावर उपाययोजना शोधण्यासाठी म्हणून आपण या तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्याचा काही उपयोगच करणार नसेल तर अशा समित्या नेमूच नयेत असे मला वाटते. महापूर रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-पर्याय सूचविले जातात, तसाच भिंत घालण्याचा पर्याय पुढे आला होता. मी त्यावेळी हा एक पर्याय असू शकतो एवढेच म्हटले होते. हा काय राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही. किंवा मला भिंत बांधायचीच आहे असेही नाही. लोकांचा त्याबद्दल आक्षेप असेल तर आम्हीही या पर्यांयाचा विचार करणार नाही. तज्ज्ञांनी सूचविलेल्या उपाययोजना करायच्या झाल्यास सरकार म्हणून आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यावेळी लोकांनीही त्यास सहकार्य करावे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कौतुक

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापुराच्या अगोदरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून अलमट्टीचे पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्याचा चांगला उपयोग झाला, अन्यथा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असते अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.