शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

वडनेरे,गाडगीळ समितीच्या शिफारशींचा जरूर अंमल करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील शिफारशी अंमलात आणण्याचे धाडस नसते म्हणूनच ते बासनात गुंडाळून ठेवले जातात. मी असे घडू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. वडनेरे, गाडगीळ समितीपासून अन्य समित्यांचे आतापर्यंत जे अहवाल सादर झाले, त्यातील महत्त्वाच्या शिफारसी एकत्रित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, सगळ्या अहवालांचे एकत्रिकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे असतील ते एकत्रित करा. हे मुद्दे लोकांसमोर आले पाहिजेत. संकट आल्यावर उपाययोजना शोधण्यासाठी म्हणून आपण या तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्याचा काही उपयोगच करणार नसेल तर अशा समित्या नेमूच नयेत असे मला वाटते. महापूर रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-पर्याय सूचविले जातात, तसाच भिंत घालण्याचा पर्याय पुढे आला होता. मी त्यावेळी हा एक पर्याय असू शकतो एवढेच म्हटले होते. हा काय राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही. किंवा मला भिंत बांधायचीच आहे असेही नाही. लोकांचा त्याबद्दल आक्षेप असेल तर आम्हीही या पर्यांयाचा विचार करणार नाही. तज्ज्ञांनी सूचविलेल्या उपाययोजना करायच्या झाल्यास सरकार म्हणून आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यावेळी लोकांनीही त्यास सहकार्य करावे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कौतुक

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापुराच्या अगोदरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून अलमट्टीचे पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्याचा चांगला उपयोग झाला, अन्यथा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असते अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.