शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरे,गाडगीळ समितीच्या शिफारशींचा जरूर अंमल करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राज्य शासनाने ज्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या, त्यांचे अहवाल आले आहेत. त्या अहवालातील शिफारशी अंमलात आणण्याचे धाडस नसते म्हणूनच ते बासनात गुंडाळून ठेवले जातात. मी असे घडू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. वडनेरे, गाडगीळ समितीपासून अन्य समित्यांचे आतापर्यंत जे अहवाल सादर झाले, त्यातील महत्त्वाच्या शिफारसी एकत्रित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, सगळ्या अहवालांचे एकत्रिकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे असतील ते एकत्रित करा. हे मुद्दे लोकांसमोर आले पाहिजेत. संकट आल्यावर उपाययोजना शोधण्यासाठी म्हणून आपण या तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्याचा काही उपयोगच करणार नसेल तर अशा समित्या नेमूच नयेत असे मला वाटते. महापूर रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना-पर्याय सूचविले जातात, तसाच भिंत घालण्याचा पर्याय पुढे आला होता. मी त्यावेळी हा एक पर्याय असू शकतो एवढेच म्हटले होते. हा काय राज्य सरकारने घेतलेला निर्णय नाही. किंवा मला भिंत बांधायचीच आहे असेही नाही. लोकांचा त्याबद्दल आक्षेप असेल तर आम्हीही या पर्यांयाचा विचार करणार नाही. तज्ज्ञांनी सूचविलेल्या उपाययोजना करायच्या झाल्यास सरकार म्हणून आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यावेळी लोकांनीही त्यास सहकार्य करावे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कौतुक

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापुराच्या अगोदरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून अलमट्टीचे पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्याचा चांगला उपयोग झाला, अन्यथा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असते अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.