शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
3
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
4
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
5
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
6
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
7
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
8
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
9
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
10
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
11
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
12
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
13
डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
14
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
15
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
16
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
17
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
18
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
19
'IC-814' हायजॅक आणि मसूद अजहरची सुटका; त्या ७० तासांत नेमकं काय घडलं? कुख्यात दहशतवाद्याचा नवा दावा
20
ITC-Godfrey Phillips India Stocks: सरकारच्या एका निर्णयानं 'या' कंपन्यांना जोरदार झटका, दोन दिग्गज कंपन्यांचे शेअर्स आपटले; ६०००० कोटी बुडाले
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पोलिसांचे संख्याबळ अपुरे

By admin | Updated: April 29, 2017 00:43 IST

वडगाव पोलिसांचे संख्याबळ अपुरे

तीन अधिकारी; ४९ कर्मचारी कामाच्या तणावात : गुन्हेगारी क्रमवारीत जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावरआयुब मुल्ला ल्ल खोचीपेठवडगाव पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कित्येक वर्षांपासून गुन्ह्यांच्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे परिसरातील २२ गावांत होणाऱ्या गुन्ह्यांची उकल करताना जिकिरीचे होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील इतर काही ठाण्यांची नेमणुकीची आकडेवारी पाहता वडगाव मात्र अपेक्षित संख्याबळापासून उपेक्षितच राहिले आहे. सध्या प्रशासकीय बदल्यांचा हंगाम सुरू आहे. त्याचा विचार करता किमान अजून जादा पाच पोलिस अधिकारी व वीस कर्मचारी देणे गरजेचे आहे. त्यामुळे जलदगतीने गुन्हे तपासणी होईल.वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बावीस गावे आहेत. नऊ किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग आहे. इचलकरंजी, सांगली, तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा मार्ग आहे. गेल्या चार वर्षांपासून हा परिसर संवेदनशील बनला आहे. वार्षिक गुन्हे सुमारे २०० प्रलंबित आहेत. अश सर्व परिस्थिती व पार्श्वभूमीचा विचार करता सध्याच्या संख्याबळाला प्रचंड कामाचा ताण आहे, ही वस्तुस्थिती आहे.सध्या एक पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यासह ४९ पोलिस कर्मचारी आहेत.विद्यमान पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह यापूर्वीचे प्रशिक्षणार्थी अधिकारी चिन्मय पंडित (आयपीएस) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोलिस अधिकारी व कर्मचारी संख्या वाढवावी, अशी मागणी केलेली आहे.१ या ठाण्याला ४५ पोलिस कर्मचारी कित्येक वर्षापासून मंजूर आहेत. त्यानंतर लोकसंख्यावाढ, गुन्हेगारी याचा वाढलेला आलेख लक्षातच घेतला गेलेला नाही, असेच म्हणावे लागेल. साडेतीन दशके जुनीच मंजुरी पाहिली जाते. त्यामध्ये बदल गरजेचा आहे.२ यासाठी गेल्या तीन वर्षांत सतत मागणी करण्यात आली; पण अद्यापही यश आलेले नाही. तरीसुद्धा पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नियोजनात्मक कार्यपद्धतीचा अवलंब करीत गुन्हेगारीवर वचक बसविणे यासह पेंडींग गुन्ह्यांचा निपटारा करण्यास प्राधान्य दिले आहे. ३ अपुऱ्या संख्याबळामुळे अनेक अडचणींची संख्या वाढतच आहे. यासाठी संख्याबळ वाढवून देणे गरजेचे आहे. सध्या तीन अधिकारी व ४९ पोलिस कर्मचारी आहेत. यामध्ये अजून पाच अधिकारी व वीस पोलिस कर्मचारी वाढवून मिळणे गरजेचे आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरच वाढत चाललेला ताण कमी होईल.