शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:35 IST

कोल्हापूर । लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज, सोमवारी ३३४२ केंद्रांवर मतदान होत आहे. सर्व दहा मतदार संघांत ...

कोल्हापूर । लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज, सोमवारी ३३४२ केंद्रांवर मतदान होत आहे. सर्व दहा मतदार संघांत १०६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद होत आहे. सर्वच मतदार संघात प्रचंड चुरस असून लढती अटीतटीच्या होत आहेत. किमान पाच मतदार संघांत बंडखोर उमेदवारांमुळे महायुतीच्या उमेदवारांसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले, त्यामुळे असाच पाऊस सुरु राहिला तर मतदारांना बाहेर कसे आणायचे, असे नवे संकट उमेदवारांसमोर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, जनसुराज्यचे नेते विनय कोरे, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कडेकोट बंदोबस्त५,५०० स्थानिक पोलीस, १००० होमगार्डस्, १० केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, ओडिसा, कर्नाटक, मुंबई, दौंड, पुणे रेल्वे अतिरिक्त पोलीस बळ, याशिवाय दंगल काबू पथक, जलद कृती दल व बॉम्बशोध पथके तैनात रात्रं-दिवस गस्त,आकस्मिक नाकेबंदीजीपीएस यंत्रणा असलेल्यावाहनातून ईव्हीएम पोहोचविणारमतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँगरूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका वाहनातून भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.मतदानासाठी ‘सुट्टी’सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे कामगार आयुक्तांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये १००२ व्हीव्हीपॅट, ६६८ कंट्रोल युनिट तर ७३४ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.मतदारांसाठी ३३४२ व्हीव्हीपॅटलोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच तीन हजार ३४२ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.कुठे काही गडबड झाली तर काय?जिल्ह्यातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटांत शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तत्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाºयांवर कडक कारवाई करेल. सामेवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीस अधीक्षक (एसपी) ते पोलीस कॉन्स्टेबल (पीसी) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.