शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

मतविभागणी ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: October 2, 2014 00:16 IST

शेट्टींचा करिश्मा टिकणार का? : मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र येथे विद्यमान आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड व ‘स्वाभिमानी’चे अमर पाटील यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. येथे मतविभागणीचा फटका विनय कोरे, तसेच सत्यजित पाटील यांना बसणार आहे. तर मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी शक्तिप्रदर्शन केले आहे, तर सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सरुड येथे सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा आदेश दिला आहे. लोकसभेला या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी ४५ हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘स्वाभिमानी’कडून अमर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. ‘स्वाभिमानी’ची खरी ताकद या निवडणुकीत समजणार आहे. तसेच राष्ट्रवादीची या मतदारसंघावर पकड आहे. राष्ट्रवादीकडून बाबासो पाटील-आसुर्लेकर हे आपले नशीब अजमावत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार कर्णसिंह गायकवाड यांनी वाड्या-वस्त्या पिंजून काढून प्रचारात आघाडी घेतली आहे. मनसे, ब्लॅक पँथर, बहुजन समाज पार्टीचे उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत.येथे पक्षापेक्षा गटा-तटांच्या राजकारणाला चलती आहे. शाहूवाडी तालुक्यात सरुडकर, कर्णसिंह गायकवाड व मानसिंगराव गायकवाड गट मातब्बर आहेत. येथील राजकारण गटाभोवती केंद्रीत असते. गत निवडणुकीपासून आ. विनय कोरे गटाची ताकद वाढू लागली आहे. खुद्द शाहूवाडीतून स्थानिक दोन, तर पन्हाळा तालुक्यातून चार उमेदवार उभा आहेत. पन्हाळ्यातून नाराज असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भारत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या पक्षाचा उमेदवार उभा असला तरी त्यांचे कार्यकर्ते सेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे मानसिंगराव गायकवाड यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आ. कोरे यांच्यासमोर मतविभागणीचा मोठा प्रसंग उभा आहे, तर एकेकाळी बाबासाहेब पाटील-सरुडकर गटाचे काम करणारे बाबासो पाटील-आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केल्याने सत्यजित पाटील यांनादेखील मतविभागणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या रात्रीपर्यंत येथील वातावरण चांगलेच तापणार आहे. मात्र, आदल्या रात्री कोण-कोणाला पाठिंबा देणार? आतून मदत घेणार का? हे शेवटच्या दिवसापर्यंत कोणालाही कळणार नाही. मात्र, खरी लढत दुरंगी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शेवटी उमेदवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.