शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

मतविभागणी ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: October 2, 2014 00:16 IST

शेट्टींचा करिश्मा टिकणार का? : मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र येथे विद्यमान आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड व ‘स्वाभिमानी’चे अमर पाटील यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. येथे मतविभागणीचा फटका विनय कोरे, तसेच सत्यजित पाटील यांना बसणार आहे. तर मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी शक्तिप्रदर्शन केले आहे, तर सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सरुड येथे सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा आदेश दिला आहे. लोकसभेला या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी ४५ हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘स्वाभिमानी’कडून अमर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. ‘स्वाभिमानी’ची खरी ताकद या निवडणुकीत समजणार आहे. तसेच राष्ट्रवादीची या मतदारसंघावर पकड आहे. राष्ट्रवादीकडून बाबासो पाटील-आसुर्लेकर हे आपले नशीब अजमावत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार कर्णसिंह गायकवाड यांनी वाड्या-वस्त्या पिंजून काढून प्रचारात आघाडी घेतली आहे. मनसे, ब्लॅक पँथर, बहुजन समाज पार्टीचे उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत.येथे पक्षापेक्षा गटा-तटांच्या राजकारणाला चलती आहे. शाहूवाडी तालुक्यात सरुडकर, कर्णसिंह गायकवाड व मानसिंगराव गायकवाड गट मातब्बर आहेत. येथील राजकारण गटाभोवती केंद्रीत असते. गत निवडणुकीपासून आ. विनय कोरे गटाची ताकद वाढू लागली आहे. खुद्द शाहूवाडीतून स्थानिक दोन, तर पन्हाळा तालुक्यातून चार उमेदवार उभा आहेत. पन्हाळ्यातून नाराज असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भारत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या पक्षाचा उमेदवार उभा असला तरी त्यांचे कार्यकर्ते सेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे मानसिंगराव गायकवाड यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आ. कोरे यांच्यासमोर मतविभागणीचा मोठा प्रसंग उभा आहे, तर एकेकाळी बाबासाहेब पाटील-सरुडकर गटाचे काम करणारे बाबासो पाटील-आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केल्याने सत्यजित पाटील यांनादेखील मतविभागणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या रात्रीपर्यंत येथील वातावरण चांगलेच तापणार आहे. मात्र, आदल्या रात्री कोण-कोणाला पाठिंबा देणार? आतून मदत घेणार का? हे शेवटच्या दिवसापर्यंत कोणालाही कळणार नाही. मात्र, खरी लढत दुरंगी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शेवटी उमेदवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.