शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मतविभागणी ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: October 2, 2014 00:16 IST

शेट्टींचा करिश्मा टिकणार का? : मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र येथे विद्यमान आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड व ‘स्वाभिमानी’चे अमर पाटील यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. येथे मतविभागणीचा फटका विनय कोरे, तसेच सत्यजित पाटील यांना बसणार आहे. तर मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी शक्तिप्रदर्शन केले आहे, तर सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सरुड येथे सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा आदेश दिला आहे. लोकसभेला या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी ४५ हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘स्वाभिमानी’कडून अमर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. ‘स्वाभिमानी’ची खरी ताकद या निवडणुकीत समजणार आहे. तसेच राष्ट्रवादीची या मतदारसंघावर पकड आहे. राष्ट्रवादीकडून बाबासो पाटील-आसुर्लेकर हे आपले नशीब अजमावत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार कर्णसिंह गायकवाड यांनी वाड्या-वस्त्या पिंजून काढून प्रचारात आघाडी घेतली आहे. मनसे, ब्लॅक पँथर, बहुजन समाज पार्टीचे उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत.येथे पक्षापेक्षा गटा-तटांच्या राजकारणाला चलती आहे. शाहूवाडी तालुक्यात सरुडकर, कर्णसिंह गायकवाड व मानसिंगराव गायकवाड गट मातब्बर आहेत. येथील राजकारण गटाभोवती केंद्रीत असते. गत निवडणुकीपासून आ. विनय कोरे गटाची ताकद वाढू लागली आहे. खुद्द शाहूवाडीतून स्थानिक दोन, तर पन्हाळा तालुक्यातून चार उमेदवार उभा आहेत. पन्हाळ्यातून नाराज असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भारत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या पक्षाचा उमेदवार उभा असला तरी त्यांचे कार्यकर्ते सेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे मानसिंगराव गायकवाड यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आ. कोरे यांच्यासमोर मतविभागणीचा मोठा प्रसंग उभा आहे, तर एकेकाळी बाबासाहेब पाटील-सरुडकर गटाचे काम करणारे बाबासो पाटील-आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केल्याने सत्यजित पाटील यांनादेखील मतविभागणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या रात्रीपर्यंत येथील वातावरण चांगलेच तापणार आहे. मात्र, आदल्या रात्री कोण-कोणाला पाठिंबा देणार? आतून मदत घेणार का? हे शेवटच्या दिवसापर्यंत कोणालाही कळणार नाही. मात्र, खरी लढत दुरंगी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शेवटी उमेदवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.