शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

कोल्हापुरात वळवाची हजेरी

By admin | Updated: May 28, 2014 00:58 IST

जिल्ह्यातही पाऊस : शहरात तासभरात पाणीच-पाणी

कोल्हापूर : सकाळपासून अंगाची लाही-लाही होऊन घामाच्या धारांमुळे बेजार झालेले कोल्हापूरकर आज, मंगळवारी दुपारी अचानक झालेल्या वळवाच्या पावसाने सुखावून गेले. पावसाने सुमारे तासभर जोरदार हजेरी लावल्याने शहरात पाणीच पाणी झाले होते. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे उष्मा वाढून घामाघूम झालेले नागरिक शीतपेये व थंडगार पाण्याचा आधार घेत होते. दुपारी तीनपर्यंत अंगाची लाही-लाही करणार्‍या उन्हामुळे घरातून बाहेर पडणेही नागरिकांच्या जीवावर आले होते. त्याचबरोबर घरात थांबूनही पंख्यांचे वारेसुद्धा गारवा न देणारे होते. त्यामुळे नागरिक बेजार झाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास वातावरणात बदल होऊन अचानक ढगाळ वातावरण झाले. पाऊस पडण्याची चाहूल लागली. काही वेळांतच पावसाने प्रत्यक्ष हजेरीही लावली. बघता-बघता पावसाने जोर धरला. यावेळेस नागरिकांची धावपळ उडाली तर या पावसाचा बच्चेकंपनीने मनमुराद आनंद लुटला. दिवसभर गर्मी आणि संध्याकाळी गारवा असे विचित्र वातावरण राहिल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले. या पावसामुळे नागरिकांना सायंकाळी सुखद गारवा मिळाला. या पावसामुळे शहर व आसपासच्या परिसरात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)